Chhoti Badi Baatein

  • हिंदी निबंध संग्रह - Hindi Essay Collection

Diwali Nibandh in Marathi – दिवाळी निबंध मराठी

(दिवाळी निबंध मराठी – Diwali Essay in Marathi – Diwali Festival Essay in Marathi – Diwali Nibandh in Marathi – Short Diwali Essay in Marathi – Diwali Information in Marathi Essay) 

मित्रांनो दिवाळी हा भारतीयांचा मुख्य सण आहे आणि तो भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे, ज्याच्या आगमनामुळे आपल्या समाजातील विविध स्तरातील लोक एकत्र येत असल्याने सणाचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व वाढते.

आजच्या लेखाद्वारे आम्ही तुमच्यासोबत विविध शब्द मर्यादांमध्ये “ दिवाळी निबंध मराठी (Diwali Essay in Marathi) ” शेअर करत आहोत.

Table of Contents

Diwali Festival Essay in Marathi – (10 lines) दिवाळी वर मराठी निबंध

10 Lines on Diwali Festival Essay in Marathi

  • दिवाळी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, ज्याला “दीपावली” असेही म्हणतात.
  • दिवाळी हा हिंदू संस्कृतीला आधार देणारा महत्त्वाचा सण आहे.
  • दिवाळी हा आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुध्द द्वितीयेपर्यंत पाच दिवसांचा सण असतो.
  • दिवाळीच्या सणातल्या पाच दिवसांत प्रत्येक घरी कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास केली जाते.
  • दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची परंपरा असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.
  • दिवाळीच्या दिवशी घरासमोर सुंदर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात.
  • फटाक्यांबरोबरच मुलांना दिवाळीत नवीन आणि छान कपडे आणि विविध खेळणीही मिळतात.
  • दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला जातो आणि इतरांनाही शेअर केला जातो.
  • दिवाळीच्या काळात घर, कार्यालय, कारखाने सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
  • दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो त्यामुळे सर्वत्र एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

Short Essay On Diwali In Marathi – (200 शब्द ) दिवाळी निबंध मराठी

दिवाळी हा हिंदूंचा अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण आहे. दिवाळी हा आपल्या भारतात साजरा होणारा सर्वात मोठा सण आहे. तसे, आपल्या भारतात अनेक सण साजरे केले जातात. पण दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. 

त्रेतायुगात 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान श्री राम अयोध्येत परतल्याचा आनंदोत्सव साजरा करताना अयोध्येत सर्वत्र दिवे लावण्यात आले होते, त्यामुळे संपूर्ण अयोध्या स्वर्गासारखी उजळून निघाली होती. भगवान रामाच्या अयोध्येत आगमन झाल्याबद्दल दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळी सण हा 5 दिवसांचा सण आहे. वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत हा सण साजरा केला जातो. या उत्सवातील महत्त्वाच्या दिवसांमध्ये वसु-बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज यांचा समावेश होतो. दिवाळी हा सण प्रामुख्याने उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

दसऱ्यानंतर 20 दिवसांनी दिवाळी येते. दसऱ्यानंतर प्रत्येक घरात दिवाळीची तयारी सुरू होते. घराची डाग-डुजी करणे, साफसफाई करणे, रंगकाम करणे, नवीन कपडे खरेदी करणे, विविध प्रकारची मिठाई घरा-घरामध्ये बनवली जाते. 

सर्वत्र दिवे आणि आकाश कंदील लावले जातात, प्रवेशद्वारावर, अंगणात रांगोळ्या काढल्या जातात, फटाके फोडले जातात आणि स्वादिष्ट फराळाचा आस्वादही घेतला जातो.

दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधलेले जातात. नवीन कपडे घालून फटाके फोडण्याचा आनंद घेतल्या जातो. दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांकडे जातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात, मिठाई देतात. अशा प्रकारे दिवाळी हा एक आनंदाचा सण आहे जो आपल्या जीवनात आनंद, प्रेम आणि बंधुभाव पसरवतो.

Essay On Diwali In Marathi – (500 शब्द ) दिवाळी वर मराठी निबंध

दिवाळीचे दुसरे नाव ‘दीपावली’ आहे. या सणाचा अर्थ ‘दीपोत्सव’ किंवा ‘प्रकाशोत्सव’ असा आहे. दीपोत्सवात घरांच्या अंगणात अगणित दिवे लावले जातात. दिव्यांच्या या असंख्य रांगा आकाशातील ताऱ्यांसारख्या दिसतात.

दिवाळी सणासुदीचे दिवे सुंदर, रंगीबेरंगी आणि निसर्गाचे प्रतिनिधित्व करतात. दिव्यांच्या या तारांमुळे रात्रीच्या अंधारात घरे अधिक सुंदर दिसतात. लोकांच्या घरांचे अंगण जणू दिव्यांच्या ओळीने सजले जातात. या ओळी एक चैतन्यशील वातावरण तयार करतात जे प्रत्येकाला हवेहवेसे वाटते.

या उत्सवाची सुरवात ‘वसुबारस’ पासून होते आणि ‘भाऊबीज’ साजरा केल्यानंतर, दिवाळीची सांगता होते. दिवाळी हा सर्व वयोमान्य, मुले, स्त्री-पुरुषांच्या हृदयातील प्रेमाचा सण आहे. दिवाळी मुळे प्रत्येक घराला एक अनोखे रूप आणि अनुभव येते. हा सण नवीन कपडे, दागिने आणि सामान्य घरगुती वस्तू खरेदी करण्याची संधी आहे. याबरोबरच फटाक्यांची आतिशबाजी आणि विविध दिवाळी फराळाच्या स्वादाची अनोखी भरपूर अनुभवायला मिळते.

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपली प्राचीन संस्कृती आपल्याला सर्व प्राण्यांशी प्रेमाने वागण्याची शिकवण देते. या शिकवणीनुसार वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यांना गोड खाद्य पदार्थ दिले जाते. गायीपासून आपल्याला दूध व इतर फायदे मिळतात आणि शेतीसाठी बैलांची मदत महत्त्वाची आहे. या गोष्टी लक्षात ठेवून गोधनाची कृतज्ञतापूर्वक पूजा केली जाते.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यांचा विशेष मान असतो. ह्या दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा दिवाळीचा मुख्य पहिला दिवस आहे. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे, नवीन वस्त्रे परिधान करायची, देवदर्शन करायचे, आणि सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी फराळ करून ह्या दिवसाचा आनंद साजरा करायचा असतो.

ह्या दिवसाची एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे, या कथेअनुसर भगवान श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली होती तो हा दिवस. दुष्टांचा नाश आणि सुटकेचा आनंद ही या दिवसातील एक महत्त्वाची घटना आहे आणि याचे कारण म्हणजे या दिवसामागचा आनंद साजरा करण्यासाठी ही कथा सांगितली जाते.

अश्विन महिन्याचे शेवटचे दोन दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले दोन दिवस – या चार दिवसांच्या मुख्य दिवाळीच्या अवसरी, आपल्याला विशेषपणे आकर्षक आणि महत्त्वपूर्ण कामांसाठी सजवायला मिळतात. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी, घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, आणि ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरोघरी सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा केली जाते. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतात. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनानंतर, आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) ह्या देवीची पण पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या नंतर, फटाक्यांची आतिशबाजी केल्यानंतर, त्या दिवसाच्या आनंदाच्या घडणारांमध्ये आपल्याला सहभागी व्हायला मिळतो.

या नंतर पाडवा, असा एक दिवस आहे जो बलिप्रतिपदा आणि साडेतीन मुहुर्तांच्या एक मुहुर्तातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी, अनेक नवे प्रकल्प सुरू केले जातात. पाडव्याच्या दिवशी, पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून विविध वस्तू, दागिने, किंवा साडी उपहार देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच “यमद्वितीया” किंवा “भाऊबीज” असे म्हणतात. बहीण आणि भाऊ यांच्यातील उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहीण भावाला आंघोळ घालते, गोड अन्न अर्पण करते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू ओवाळणी घालतो.

दिवाळीच्या सणातला लहान मुला-मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला बनवणे, त्यावर चित्रे मांडणे, फटाके उडवणे आणि सुट्यांचा आनंद घेणे असा आणि स्त्रियांसाठी संध्याकाळी दारापुढे छान रांगोळ्या काढणे आणि स्वादिष्ट व्यंजन तयार करणे, ह्या सणाच्या विशेष आनंदाच्या घडणारांमध्ये एक आहे.

एकमेकांना भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड्स वगैरे देऊन आनंद साजरा केला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश आणणारी ही दिवाळी सर्वांना प्रिय आहे. जो तो त्याच्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो आणि आनंद घेतो. दिवाळी म्हणजे अमर्याद आनंद, दिवाळीच्या अनेक सुखद आठवणी मनात अनेक दिवस रेंगाळत राहतात.

———————————————-//

अन्य लेख पढ़ें:

  • 110+ दिवाली की शुभकामनाएं संदेश – Diwali Wishes In Hindi
  • दि‍वाली पर हिंदी में कविताएँ – Diwali Poems in Hindi
  • दीवाली पर संस्कृत निबंध – Essay on Diwali in Sanskrit
  • दिवाली पर निबंध – Essay on Diwali in Hindi
  • दिवाली के बारे में जानकारी और रोचक तथ्य – Information & Interesting Facts About Diwali
  • 50+ भाई दूज पर शुभकामना संदेश – Best wishes message on Bhai Dooj in Hindi
  • भाई दूज क्यों मनाया जाता है? भाई दूज की कहानी और महत्व हिंदी में

Enjoy this blog, Please share this

  • Share on Tumblr

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

माझा आवडता सण दिवाळी निबंध Diwali Essay In Marathi

diwali essay in marathi भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा सण म्हणजे दिवाळी . तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीचा सण मोठा , नाही आनंदाला तोटा . दिवाळी हा सण अत्यंत आनंद देणारा सण आहे. म्हणून भारतातच नाही तर  इतर देशात सुद्धा प्रसिद्ध आहे. diwali nibandh in marathi दिवाळी पेक्षा दीपावली हा शब्द या सणासाठी जास्त शोभून दिसतो. दीपावली म्हणजे सणांच्या ओळी . हा सण इतर सना पेक्षा वेगळा आहे त्याचे हेच कारण होय. या सणात आकाशातले तारे जमिनीवर येतात अशी कविकल्पना आहे. शरद ऋतूच्या मध्यभागी येणारा हा दीपोत्सव काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो.

diwali-essay-in-marathi

दिवाळी सण निबंध diwali essay in marathi

diwali nibandh marathi दिवाळी म्हणजे पणत्यांची आरास, दिव्यांचा उत्साह, रोषणाई, फराळ, धमाल, रांगोळी, कंदील, फटाके, मजा-मस्ती, सुट्ट्या आणि बरंच काही दिवाळी म्हटलं की सगळ्यांची लगबग सुरू होते. साफसफाई, कपड्यांची खरेदी, नवीन वस्तू, सोन्याची खरेदी, मिठाई फराळाची तयारी बाप रे! किती सारी तयारी. किती काम! पण काही असो प्रकाश आणि आसमंत उजळून टाकणारा सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो.

प्रत्येक वर्षाची दिवाळी नव्याने आनंद, उत्साह आणि भरभराट घेऊन येते. दिवाळीची मज्जा काही औरच असते. दिवाळी पहाट अभ्यंगस्नान आणि उटण्याचा सुगंध, रंगात रंगलेली रांगोळी, जगमगता कंदील, मातीचे दिवे आणि वेगवेगळे स्टिकर्स, करंजा, चिवडा, चकली वा काय भारी सण आहे. हा वर्षातून एकदा येतो आणि नवीन उमेद देतो .

अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दिवा मांगल्याचे प्रतीक मानला जातो. प्रकाशाने अंधारावर प्राप्त केलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी करतात. दिव्याच्या प्रकाशाने जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो.थंडीची चाहूल लागताच अश्विन महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दीपावली हा सण येतो. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या शुभ दिवसांनी दीपावलीचा उत्सव साजरा केला जातो.

दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी

घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करून सजविले जाते. या दिवशी घरातील पैशांची पूजा केली जाते. नुसते पैसेच नाही तर लक्ष्मी बरोबर  ज्ञानरूपी  सरस्वतीचे देखील पूजन केले जाते. म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी लोक घरासमोर कंदील लावतात. आकाश कंदील यामुळे घराला एक वेगळीच शोभा येते . वर्षभरात केले जात नाही तेवढे तिखट-गोड पदार्थ या दिवशी केले जातात. दिवाळीच्या दिवशी घरासमोर पणत्या लावून अंधाराला दूर केले जाते.

नवा दिवस नवे वर्ष नवी आशा नवा हर्ष नवे विचार नवी कल्पना नवे पाऊल नवी चेतना मनापासून ही एक इच्छा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

असे म्हणत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीला रांगोळी काढून स्वागत केले जाते.रात्रभर दिव्यांची आरास केली जाते. हा दिवस अतिशय शुभ असल्याने या दिवशी स्त्रिया सोने व चांदीचे भांडी खरेदी करतात. हा दिवस धन्वंतरी चा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. दिवाळीचा सण आपल्याला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात अडी ताण असेल तर त्याला फटाके सारखे उडवून लावा आणि आयुष्याची नव्याने सुरू करा.

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी .

त्या दिवशी सकाळी लवकर उठून सुर्योदया अगोदर अंघोळ करून तयार होण्याची परंपरा आहे. पुरातन काळात सांगण्यात येते की असुरांचा राजा नरकासुर नेपाळच्या दक्षिण प्रांतात राज्य करत होता. एका युद्धात त्याने इंद्रावण विजय प्राप्त केला आणि देवांची माता अदिती तिचे सुंदर कर्ण कुंडल हिसकावून घेतले आणि देवांच्या 16000 कन्यांना कैदेत ठेवले. म्हणून श्रीकृष्णाने नरक चतुर्दशी या दिवशी या दानवाचा वध केला आणि त्या सोळा हजार कन्याची सुटका केली. त्या कन्यांनी तेल मर्दन  करून स्नान केले.

दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन .

या दिवशी अमावस्या असते. असे असूनही हा दिवस शुभ मानला जातो. कारण या दिवशी संत आणि महात्मे यांनी समाधी घेऊन आपल्या देहाचा त्याग केला होता. आज दिवशी प्रभू राम सीता आणि लक्ष्मण 14 वर्षे वनवास भोगून अयोध्येत परत आले होते.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा .

हा दिवस वर्षप्रतिपदा म्हणून जाणला जातो. यादिवशी इडापिडा टाळो बळीराजाचे राज्य येऊ असे म्हणून बळीराजाची पूजा करतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर जाऊन दिवा लावतो. हा दिवस नववर्षाची सुरुवात आहे असे म्हणून व्यापारी मंडळी आपल्या व्यवसायाची पूजा करतात. या दिवशी घरामध्ये पाडवा घालतात.

पत्नी आपल्या नवऱ्याला उटणे लावून अभ्यंगस्नान घालते अन नंतर पाटावरती रांगोळी काढून पत्नी आपल्या नवऱ्याला ओवाळते. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी नवरीच्या माहेरी साजरी केली जाते. याला दिवाळी सण म्हणतात. यादिवशी जावयाला आहेर केला जातो. नवरा बायकोला सुंदर अशी भेटवस्तू देतो. असेही म्हणण्यात येते की या दिवशी इंद्र देवाच्या कृपेने गोकुळात अतिवृष्टी झाली होती म्हणून श्रीकृष्णाने प्रजेच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.

दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज

दिवाळी कविता मराठी.

आली आली दिवाळी बहीण भावाला ओवाळी साजरी करूया भाऊबीज एकत्रित येऊन आपल्या घरी

भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. भाऊ आपल्या बहिणीला सुंदर अशी भेट वस्तू  देतो. लग्न झालेल्या मुली या दिवशी आपल्या लाडक्या भावासाठी माहेरी येतात. असे पाच दिवस आनंदात साजरे केले जातात. कामानिमित्त बाहेर गेलेले लोक घरी परत जातात आणि आनंदाने दिवाळी कुटुंबासोबत साजरी करतात. दिवाळी, फटाके,रांगोळी, पणत्या या गोष्टी येतात पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किल्ला.

लहान मुलं एकत्र जमून किल्ला बनवता. आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले यांना फार पूर्वीपासून मोलाचे महत्त्व आहे. किल्ले बनवण्याची परंपरा आपल्या पूर्वजांनी आपला अभिमानास्पद इतिहास पुढच्या पिढीने आत्मसात करावा याकरता निर्माण केला गेला आहे. लहान मुलं एकत्र येऊन दगड,विटा,माती गोळा करतात आणि आपल्या मनातील गडाला हवा तसा आकार देतात.

त्यावर मातीचे बनवलेले पुतळे मावळे म्हणून ठेवतात. माती पासून बनवलेले प्राणी ठेवतात आणि किल्ल्याची सजावट करतात. यादरम्यान स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्पर्धेतून मुलांमधील आकलन शक्ती प्रदर्शित होत असते. अनेक सार्वजनिक मंडळे संस्था इतकेच नव्हे तर राजकीय पक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांच्या या गुणांना वाव देत आहे. फटाके लावणे, फराळ करणे,रांगोळी काढणे,  किल्ले बनवणे,  खरेदी करणे, एकमेकांना शुभेच्छा देणे एवढ्या सगळ्या दिवाळीचे पाच दिवस कसे निघून जातात समजतच नाही. दिवाळीच्या सणासाठी हे पाच दिवस सुद्धा कमीच आहे.

आम्ही दिलेल्या diwali essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता सण दिवाळी निबंध अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nibandh on diwali in marathi   या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि diwali nibandh marathi madhe माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण diwali nibandh in marathi या लेखाचा वापर diwali essay in marathi for class 5 6 8 असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Learning Marathi

दिवाळी निबंध मराठी | Diwali Essay in Marathi

Diwali Essay in Marathi : दिवाळी हा सण पाच दिवस चालणारा सर्वात मोठा सण आहे. दसऱ्यानंतर घराघरांत दिवाळीची तयारी सुरू होते, जी मोठ्या प्रमाणावर केली जाते. या दिवशी भगवान श्रीराम, माता सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतले. याशिवाय दिवाळीच्या संदर्भात आणखी काही पौराणिक कथा प्रचलित आहेत. निबंध वाचा

Table of Contents

मराठीतील लघु दिवाळी निबंध | Short Diwali Essay in Marathi

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असून दरवर्षी हा सण मोठ्या आनंदाने आणि आनंदाने साजरा केला जातो.दिवाळी हा आनंदाचा सण आहे.दिवाळीत पाच दिवस वेगवेगळे सण साजरे केले जातात. पाच दिवस चालणारा हा सर्वात मोठा उत्सव आहे. दसरा संपताच देशभरात दिवाळीची तयारी सुरू होते.

दिवाळीचा सण अमावस्येच्या रात्री साजरा केला जातो.प्रभू राम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले.१४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी तुपाचे दिवे लावले. दिवाळीचा सण त्याच दिवसापासून साजरा केला जातो.

दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याने प्रत्येकाचे मन उजळून निघते.या सणाच्या आगमनाने सर्व घरांमध्ये एक वेगळीच चमक निर्माण होते. दिवाळीच्या दिवशी आणि रात्री देवी लक्ष्मीची आराधना केली जाते आणि तिला नेहमी आपल्यावर आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना केली जाते.

दिवाळीत विविध प्रकारच्या मिठाई आणि चविष्ट पदार्थ तयार केले जातात.दिवाळीच्या सणात खेळ-बताशेचा प्रसाद दिला जातो. दिवाळीचा सण म्हणून फटाके, फटाके फोडले जातात.

असंख्य दिव्यांचे रंगीबेरंगी दिवे मनाला आकर्षित करतात आणि बाजारपेठा, दुकाने आणि घरांची सजावट पाहण्याजोगी राहते. या सणात लोक गरीब-श्रीमंत हा भेदभाव विसरून एकत्र येऊन सण साजरा करतात.

एकमेकांना मिठी मारून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. पाहुण्यांचे स्वागत विविध मिठाई आणि पदार्थांनी केले जाते. दिवाळी हा भेटवस्तू, भेटवस्तू आणि आनंदाचा सण आहे, हा सण नवीन जीवन जगण्याचा उत्साह देतो.

दीर्घ दिवाळी निबंध | Long Diwali Essay in Marathi

संपूर्ण भारतात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, या दिवशी प्रत्येकाच्या घरी तुपाचे किंवा तेलाचे दिवे लावले जातात. आणि त्यासोबत फटाके, फटाके वगैरे जाळले जातात. लहान मुले आणि तरुणांना सामान्यतः हा सण आवडतो कारण हा सण प्रत्येकासाठी खूप आनंदाचे आणि आनंदाचे क्षण घेऊन येतो. प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि नातेवाईकांना भेटतो आणि आपल्या प्रियजनांसोबत शुभेच्छा आणि भेटवस्तू सामायिक करतो. आपण दरवर्षी दिवाळीचा सण साजरा करतो.

दिवाळी का साजरी केली जाते?

भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. पौराणिक कथेनुसार दिवाळीचा सण साजरा करण्यामागील तर्क असा आहे की, 14 वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्री राम आपल्या जन्मभूमी अयोध्येला परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांचा अयोध्येत परतीचा आनंद साजरा केला.दिवसा तुपाचे दिवे लावले. दिवाळीचा हा पवनोत्सव दरवर्षी त्या दिवसापासून साजरा केला जातो.

दिवाळीत नातेवाईक आणि शेजाऱ्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू आणि मिठाई दिल्या जातात आणि फटाके फोडले जातात. दिवाळीच्या सणात भारतातील प्रत्येक घर दिव्यांनी उजळून निघते. दिवाळी हा सर्व लोकांसाठी महत्वाचा सण आहे.हा सण सर्व लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

सणांमध्ये दिवाळीचे महत्त्व

सर्व सणांमध्ये दिवाळीला विशेष महत्त्व आहे. हा कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो आणि हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचा सण आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. म्हणून या उत्सवाला प्रकाश पर्व किंवा दिव्यांचा उत्सव असेही म्हणतात.

वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनही दिवाळी साजरी केली जाते. आध्यात्मिकदृष्ट्या ते ‘अंधारावर प्रकाशाचा विजय’ दर्शवते. भारतात साजरे होणाऱ्या सर्व सणांमध्ये दिवाळीला सामाजिक आणि धार्मिक दोन्ही दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.

दिवाळी कधी साजरी होते

दसर्‍यानंतर 21 दिवसांनी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा सण येतो. तथापि, कार्तिक कृष्ण त्रयोदशी ते कार्तिक शुक्ल द्वितीय असे पाच दिवस या सणाची थाट आणि भव्यता असते. दिवाळी सणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासोबत आणखी चार सण साजरे केले जातात.

दिवाळीचा उत्साह केवळ एक दिवस नसून संपूर्ण आठवडाभर असतो. दिवाळीचा सण पावसाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूचा प्रारंभ दर्शवतो. दिवाळीच्या सणात वातावरण गुलाबी थंड असते. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवाळी सणाची तयारी

दिवाळीचा सण हा मोठा सण मानला जातो. त्यामुळे दिवाळीच्या एक महिना आधीपासून त्याची तयारी सुरू होते. लोक आपापल्या घरांची साफसफाई करू लागतात. पेंटिंग आणि प्लास्टरिंगसोबतच ते त्यांच्या घराच्या सभोवतालची साफसफाई करतात.

प्रत्येकजण आपल्या घरात वर्षभरात साचलेल्या सर्व रद्दी आणि तुटलेल्या वस्तू बाहेर फेकून देतो. असे मानले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. यासोबतच घरांच्या सजावटीकडेही विशेष लक्ष दिले जाते.

दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याने प्रत्येकजण आपापली घरे रंगीबेरंगी दिवे, टिन्सेल इत्यादींनी सजवतात. अशा रीतीने दिवाळीत सर्वत्र झगमगणारे दिवे आणि दिवे पाहून मन आनंदित होते. जणू चंद्र आणि तारे पृथ्वीवर आले आहेत.

दिवाळीचा इतिहास

दिवाळी हा सण भारतात प्राचीन काळापासून साजरा केला जातो. या उत्सवाचा इतिहास वेगवेगळ्या राज्यांतील लोक वेगवेगळा मानतात, परंतु बहुतेक लोकांचे असे मत आहे की, प्रभू राम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी तुपाचे दिवे लावले होते आणि प्रत्येक रस्त्यावर अयोध्येला सोन्याच्या फुलांनी सजवले होते.

प्रभू राम ज्या दिवशी अयोध्येला परतले, ती काळोखी अमावस्येची रात्र होती. त्यामुळे तेथे काहीही दिसत नव्हते, त्यामुळे अयोध्येतील लोकांनी तेथे दिवे लावले होते. हे देखील एक कारण आहे की हा दिवस अंधारावर प्रकाशाचा विजय मानला जातो. आणि हे देखील खरे आहे कारण या दिवशी संपूर्ण भारत अमावस्येच्या काळ्या रात्री असूनही दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो.

जैन धर्मातील लोक दिवाळीचा सण साजरा करतात कारण या दिवशी चोविसावे तीर्थंकर महावीर स्वामी यांना मोक्ष प्राप्त झाला आणि योगायोगाने त्यांचे शिष्य गौतम यांना याच दिवशी ज्ञानप्राप्ती झाली.

शीख धर्माचे लोकही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. ते हा सण साजरा करतात कारण या दिवशी 1577 मध्ये अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराची पायाभरणी झाली होती. तसेच शिखांचे सहावे गुरू गुरू हरगोविंद सिंग जी यांनाही याच दिवशी जहांगीरने ग्वाल्हेर तुरुंगातून सोडले होते.

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद आणि प्रसिद्ध वेदांती स्वामी रामतीर्थ यांना या दिवशी मोक्ष प्राप्त झाला. हा सण ऋतू बदलाशीही संबंधित आहे. यावेळी, शरद ऋतूतील जवळजवळ आगमन होते. त्यामुळे लोकांच्या खाण्यापिण्याच्या, पेहरावाच्या आणि झोपण्याच्या सवयीही बदलू लागतात.

दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो तसतशी घरांची चमकही वाढू लागते. दिवाळी हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, म्हणून दिवे लावून अंधारासारखा सैतान दूर होतो. दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

आपापसात बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी आपण हा सण चांगला साजरा केला पाहिजे. दिवाळी आपल्यासोबत अपार आनंद आणि प्रेम घेऊन येते. हा दिव्यांचा सण असल्याने आपण दिवे लावून तो साजरा केला पाहिजे पण फटाके, फटाके, डाळिंब अशा गोष्टींवर आपण अनावश्यक खर्च करतो.

त्यामुळे पैसा तर वाया जातोच पण पर्यावरणही दूषित होते. त्यामुळे या गोष्टींचीही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून निसर्गाची आणि इतर सजीवांची कोणतीही हानी होणार नाही. मला आशा आहे की तुम्हाला आमची दिवाळी निबंध ( Diwali Essay in Marathi ) ही पोस्ट आवडली असेल. तसेच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद

हे पण वाचा –

  • माझा आवडता सण मराठी निबंध
  • मकर संक्रांति मराठी निबंध
  • स्वच्छ भारत अभियान निबंध
  • मराठीत गांधी जयंती निबंध

नमस्कार मित्रांनो माझे नाव “Rajesh Pahan” आहे मी learningmarathi.in वेबसाइटचा संस्थापक आहे. मी गेली ३ वर्षे ब्लॉगिंग करत आहे, ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की मी मराठीत सर्व लोकांना योग्य माहिती देऊ शकेन.

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

MarathiVeda

Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी

Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी : ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला तीन भाषांमध्ये निबंद वाचायला मिळेल. तरी शेवटी ही पोस्ट वाचून तुमच्या प्रतिक्रिया कोंमेंट्स मध्ये लिहा.

Table of Contents

दिवाळी निबंध मराठी | Diwali Nibandh Marathi | Diwali Essay in Marathi

Essay On Diwali : दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.

ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. (Essay On Diwali) नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा (Essay On Diwali) हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.

अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. (Essay On Diwali) व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो. (Essay On Diwali)

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

  • दिवाळीच्या शुभेच्या | Diwali Wishes In Marathi
  • दिवाळीची संपूर्ण माहिती | Diwali Information 2023 Marathi
  • धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi
  • धनत्रयोदशीच्या शुभेच्छा | Dhantrayodashi Wishes In Marathi
  • वसुबारस निमित्त शुभेच्या | Vasubaras Wishes In Marathi
  • लक्ष्मी पूजन शुभेच्छा | Laxmi Pujan Diwali Wishes In Marathi
  • भाऊबीज शुभेच्छा | Bhaubeej Wishes In Marathi
  • नरकचतुर्दशी शुभेच्या, माहिती | Narak Chaturdashi Wishes, Info

दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.

दीपावली पर निबंध हिंदी में | Hindi Essay On Diwali

Essay On Diwali : दीपावली का त्योहार पांच दिनों तक चलने वाला सबसे बड़ा पर्व होता है। दशहरे के बाद से ही घरों में दीपावली की तैयारियां शुरू हो जाती है, जो व्यापक स्तर पर की जाती है। इस दिन भगवान श्रीराम, माता सीता और भ्राता लक्ष्मण के साथ चौदह वर्ष का वनवास पूर्ण कर अयोध्या लौटे थे। इसके अलावा दीपावली को लेकर कुछ और भी पौराणिक कथाएं प्रचलित हैं।

प्रस्तावना – प्रत्येक समाज त्योहारों के माध्यम से अपनी खुशी एक साथ प्रकट करता है। हिन्दुओं के प्रमुख त्योहार होली, रक्षाबंधन, दशहरा और दीपावली हैं। इनमें से दीपावली सबसे प्रमुख त्योहार है। इस त्योहार का ध्यान आते ही मन-मयूर नाच उठता है। यह त्योहार दीपों का पर्व होने से हम सभी का मन आलोकित करता है।

दीपावली मनाई जाती है – यह त्योहार कार्तिक माह की अमावस्या के दिन मनाया जाता है। अमावस्या की अंधेरी रात जगमग असंख्य दीपों से जगमगाने लगती है। कहते हैं भगवान राम 14 वर्ष के वनवास के बाद अयोध्या लौटे थे, इस खुशी में अयोध्यावासियों ने दीये जलाकर उनका स्वागत किया था। श्रीकृष्ण ने नरकासुर नामक राक्षस का वध भी इसी दिन किया था। यह दिन भगवान महावीर स्वामी का निर्वाण दिवस भी है। इन सभी कारणों से हम दीपावली का त्योहार मनाते हैं।

दीपोत्सव मनाने की तैयारियां – यह त्योहार लगभग सभी धर्म के लोग मनाते हैं। इस त्योहार के आने के कई दिन पहले से ही घरों की लिपाई-पुताई, सजावट प्रारंभ हो जाती है। नए कपड़े बनवाए जाते हैं, मिठाइयां बनाई जाती हैं। वर्षा के बाद की गंदगी भव्य आकर्षण, सफाई और स्वच्‍छता में बदल जाती है। लक्ष्मी जी के आगमन में चमक-दमक की जाती है।

Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी

उत्सव – यह त्योहार पांच दिनों तक मनाया जाता है। धनतेरस से भाई दूज तक यह त्योहार चलता है। धनतेरस के दिन व्यापार अपने बहीखाते नए बनाते हैं। अगले दिन नरक चौदस के दिन सूर्योदय से पूर्व स्नान करना अच्‍छा माना जाता है। अमावस्या के दिन लक्ष्मीजी की पूजा की जाती है। ( Essay On Diwali )

खील-बताशे का प्रसाद चढ़ाया जाता है। नए कपड़े पहने जाते हैं। फुलझड़ी, पटाखे छोड़े जाते हैं। असंख्य दीपों की रंग-बिरंगी रोशनियां मन को मोह लेती हैं। दुकानों, बाजारों और घरों की सजावट दर्शनीय रहती है। अगला दिन परस्पर भेंट का दिन होता है। एक-दूसरे के गले लगकर दीपावली की शुभकामनाएं दी जाती हैं। गृहिणियां मेहमानों का स्वागत करती हैं। लोग छोटे-बड़े, अमीर-गरीब का भेद भूलकर आपस में मिल-जुलकर यह त्योहार मनाते हैं।

Essay On Diwali Festival | दिवाळी निबंध इंग्रजी मध्ये

Essay On Diwali : Diwali, a festival of light is the most popular festival in India which symbolizes the spiritual “victory of good over evil, light over darkness, and knowledge over ignorance”. This year Diwali is going to be celebrated from 10th November to 15th November 2023. Diwali is an important religious festival originating all across India. Most people think of Diwali as a Hindu festival, but it is also celebrated by Sikhs and Jains with the same enthusiasm and happiness. In India, people celebrate the story of King Rama’s return to Ayodhya after defeating Ravana. People celebrate Diwali by lighting rows of clay lamps, Lakshmi puja, firecrackers festivities, and distributing sweets.

Essay On Diwali :

A “festival of lights,” Diwali (also known as Divali or Deepavali) honours the blessings of victory, freedom, enlightenment, and the triumph of light over darkness and good over evil. The word “row of lights” (Sanksrit Deepavali) is where the name originates. Diwali celebrants burn a large number of candles and clay lamps, or diyas, and scatter them throughout their homes and along the streets to illuminate the gloomy night.

The main Diwali celebration takes place on the third day of a five-day festival throughout the majority of India. Only the main day is often observed in other locations where Diwali is observed.

Diwali is observed by a large number of people globally. Thus, customs vary, but there are some commonalities, such as candle lighting and family gatherings. Since the primary Diwali celebration occurs on the new Moon’s day when the sky is the darkest and a significant portion of the celebration centres on the light. In the home, streets, places of worship, and even floating down lakes and rivers, candles, clay lamps, and oil lanterns are lit. On the night of Diwali, fireworks are also lit off, with some believing this wards off evil spirits. The meal can be rather lavish, with a table covered in speciality foods and desserts.

The Hindu calendar’s first day of the new year in India is observed on Diwali. The fourteen-year exile of Lord Ram is commemorated on this holiday. He also overcame Ravana, the ten-headed king who had kidnapped his wife, Sita, at this time. In the Ramayana, an old epic about Ram, Sita, and morality, other significant characters include Hanuman (the Monkey God) and Laxman (Ram’s younger brother).

Regardless of how it is observed, Diwali or Deepavali is a national holiday that celebrates joy, happiness, and brotherhood. Families gather to celebrate one another’s health during this time.

Even though the festival’s structure and style of celebration have changed, it will be encouraging to see youth initiatives use this day to integrate all communities further and invite everyone to take part in the celebrations. When other groups observe their own festivals, the same must be reciprocated. India will then be able to really claim the spirit of inclusivity and secularism.

तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात

Swatantrata Diwas (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन निबंध 2023

Swatantrata Diwas (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन निबंध 2023

Bail Pola Nibandh Marathi - बैल पोळा निबंध

Bail Pola Nibandh Marathi – बैल पोळा निबंध

Mahatma Gandhi Per Nibandh

Mahatma Gandhi Per Nibandh – महात्मा गांधी पर निबंध

Teachers Day Essay - शिक्षक दिन निबंध

Teachers Day Essay – 2023 शिक्षक दिन निबंध

Leave a comment cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Nibandh shala

दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi :- दिवाळी हा संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. विशेष बाब म्हणजे हा सण जवळपास प्रत्येकाचाच आवडीचा सण आहे. सर्वांनाच दिवाळी हा सण खूप आवडतो. त्यामुळेच आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध essay on diwali in marathi लिहिलेला आहे.

दिवाळी वर मराठी निबंध सर्वच विद्यार्थांसाठी खूपच उपयुक्त आहे. माझा आवडता सण दिवाळी निबंध my favourite festival diwali essay in marathi हा तुम्हाला नक्कीच आवडेल.

दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi

दिवाळी वर 10 ओळीचा निबंध | 10 lines on my favourit festival diwali in marathi.

  • दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे.
  • हा सण इंग्रजी दिनदर्शिका नुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो. या सणाची तारीख निश्चित नसते.
  • दिवाळीला दीपावली किंवा दीपोत्सव असे देखील म्हटले जाते.
  • दिवाळीच्या दिवशी घराची आणि अंगणाची स्वच्छ्ता केली जाते, अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते.
  • दिवाळीच्या दिवशी अंगाला उठणे लाऊन अंघोळ करण्याची प्रथा आहे.
  • दिवाळीच्या दिवशी अंगणात मातीचे दिवे लावले जातात. त्यामुळे या सणाला प्रकाशाचा सण म्हणून देखील ओळखले जाते.
  • दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे भाहुबिज होय. या दिवशी बहीण भावला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रेरणा करते.
  • लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते.
  • दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दिवू लावले जातात आणि लहान मुले फटाके फोडून आनंद व्यक्त करतात.
  • दिवाळीच्या दिवशी लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे आणि गुलाब जमून हे फराळाचे पदार्थ खायला मिळतात. मला दिवाळी हा सण खूप आवडतो.

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi (700+ शब्दात)

Essay on diwali in marathi

भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. भारत देशात संपूर्ण वर्षभर विविध धार्मिक , सांस्कृतिक आणि सामाजिक सण उत्सव साजरे केले जातात. यातून सामाजिक बांधिलकी जोपासली जातेच शिवाय लोक मतभेद विसरून एकत्र जमतात.

मला तसे तर हिंदू संस्कृतीमध्ये साजरे केले जाणारे सर्वच सण उत्सव आवडतात पण दिवाळी हा माझा सर्वात जास्त आवडणारा सण आहे. म्हणजेच माझा आवडता सण दिवाळी आहे. या सणाला दिवाळी किंवा दीपावली असे देखील म्हटले जाते. अनेक कवी आणि लेखक दिवाळी या सणाचे वर्णन दीपोत्सव असे देखील करतात. कारण या सणाच्या दिवशी सायंकाळी दिवे लावण्याची प्रथा आहे.

  • माझी आजी मराठी निबंध
  • माझी शाळा मराठी निबंध
  • झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध

दिवाळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सर्वात मोठा हिंदू सण आहे. हा सण केवळ हिंदूच नव्हे तर इतर धर्मीय लोक देखील साजरा करताना दिसतात. या सणाचे विशेष म्हणजे यातून खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.

दिवाळी (essay on diwali in marathi) हा सण आश्विन या मराठी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिका नुसार दिवाळी हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये येतो. पण या सणाची तारीख निश्चित नसते. हा सण कधी ऑक्टोबर महिन्यात येतो तर कधी नोव्हेंबर महिन्यात येतो. हा सण भारताबाहेर विदेशात राहणारे हिंदू धर्मीय लोक देखील मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसून येतात.

दिवाळी सणाच्या निमित्ताने शाळेला पंधरा ते वीस दिवस सुट्या असतात. तसेच ऑफिस आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील आठ ते दहा दिवस सुट्या असतातच. त्यामुळे घरातील सर्व मंडळी एकत्र असतात. तेंवहापासून दिवाळी सणाच्या तयारीला सुरुवात होते.

गावातील आम्ही सर्व मित्र एकत्र जमतो आणि सुंदर किल्ले बनवतो. किल्ले बनवण्यात एक वेगळीच मजा असते. तसेच आम्ही संपूर्ण गावासठी एक मोठा आकाश कंदील तयार करतो. यासाठी आम्हाला गावातील इतर ज्येष्ठ मंडळींची मदत देखील लाभते. नंतर हा आकाशकंदील गावच्या मध्यभागी लावण्यात येतो.

आमच्या घरी देखील मी आणि माझी बहिण मिळून एक छोटा आकाश कंदील बनवतो. आई आणि आत्या फराळाचे पदार्थ बनवण्यात व्यस्त असतात.लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे असे अनेक पदार्थ बनवण्यात येतात. यात सर्वांचे आवडते गुलाब जमून तर मला खूपच आवडतात. दिवाळीच्या अगोदर आम्ही सर्वजण मिळून घराची आणि अंगानाची स्वच्छता करतो.

दिवाळीचा सण (diwali festival essay in marathi) हा तीन किंवा पाच दिवसांचा असतो. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं आणि दुसरं पाणी असतं. तिसऱ्या दिवशी भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन असते.दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला उठणे लावून आंघोळ केली जाते.

घरातील सर्व मंडळी नवीन कपडे परिधान करतात आणि आनंदाने फराळाचे पदार्थ खातात. या दिवशी पाहुण्यांना आणि मित्रांना घरी फराळाला बोलावण्याची प्रथा आहे. लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. घरातील प्रौढ मंडळी लहान चिमुकल्यांना पैसे आणि भेटवस्तू देतात.

ताई अंगणात सडा टाकून सुंदर रांगोळी काढते. सायंकाळी अंगणात दिवे लावले जातात. घरातील मंडळी आणि लहान मुले फटाके वाजवून आनंद व्यक्त करतात. फटाके वाजवणे लहान मुलांना खूप जास्त आवडते.

भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्य साठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीला भेटवस्तू देतो आणि रक्षण करण्याचे शपथ घेतो. त्याचप्रमाणे त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते.

  • मी शिक्षक झालो तर मराठी निबंध

दिवाळी हा सण खूपच आनंदाचा आणि जल्लोषाचा असतो. यात मनोरंजन तर होतेच आणि समाजातील लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. त्यामुळे दिवाळी हा सण मला खूप खूप आवडतो.

टीप: मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दिवाळी वर मराठी निबंध, माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi लिहून दिलेला आहे. हा सण इयत्ता १,२,३,४,५,६,७,८,९,१० पर्यंत कोणत्याही वर्गासाठी तुम्ही वापरू शकता.

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्ही दिवाळीला कश्या प्रकारे मज्जा करता, ते देखील कमेंट करून कळवा, धन्यवाद…!

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

MarathiPro

दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

  • Chetan Jasud
  • July 20, 2021
  • मराठी निबंध

दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

जर तुम्ही दिवाळी निबंध मराठीमध्ये । Diwali Essay in Marathi । Essay on Diwali in Marathi शोधत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये आपण दिवाळी निबंध मराठी मध्ये अगदी योग्य शब्दात पहाणार आहोत. Essay on Diwali in Marathi सोबत इतरही निबंध वाचायला विसरू नका. दिवाळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी असल्याने शाळेमध्ये आपल्याला हमखास यावर निबंध परीक्षेमध्ये विचारला जातो. सोबत इतर निबंध स्पर्धांमध्ये हा विषय हमखास असतोच. यासाठी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत दिवाळी या भारतीय सणावर मराठीत निबंध (Diwali Nibandh in Marathi)

दिवाळी निबंध मराठी मध्ये । Essay on Diwali in Marathi (जास्त शब्दांमध्ये)

दिवाळी निबंध मराठी मध्ये । Diwali Essay in Marathi | Diwali Nibandh in Marathi

आपला भारत देश हा सणांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण आणि उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करतो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा शब्द संस्कृत भाषेतून घेतला गेला आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी साजरी केली जाते. तसे पहायला गेले तर दसऱ्यापासूनच घराघरात दिवाळीची तयारी सुरु होत असते. दिवाळी पूर्ण भारतभर मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात साजरी केली जाते. दिवाळीमध्ये लोकांमध्ये खूप उत्साह संचारतो. पण दिवाळी केवळ भारतातच साजरी होते असे काही नाही तर भारताबाहेरही साजरी केली जाते. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय लोकांमुळे दिवाळी भारताबाहेरही प्रसिद्ध आहे. दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा ना राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला. दिवाळी विषयी बऱ्याच गमतीजमती आहेत. दिवाळी हा सण साजरा करण्यामागे बरीच करणे आहेत जी हिंदू पुराणांमध्ये तसेच इतर साहित्यातही आहे.

प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे. श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वाढ केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे दुसऱ्या दिवशी गोकुळवासियांनी दिवे लावून आनंद साजरा केला होता.

देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसाचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान श्री शंकराने स्वतः देवीच्या चरणी लोटांगण घातले. तेव्हा महाकालीचा राग शांत झाला होता. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.

बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रिलोकात विजय मिळवला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून वीसहून वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायात दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्रिलोक घेतले. बळीच्या दानशूरपणा मुळे प्रसन्न झालेल्या वीसहून त्याला पाटलाचे राज्य देऊन भू-लोकवासी त्याची आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.

शिखांचे सहावे गुरु हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतून सुटून कार्तिक अमावास्येच्या दिवशी अमृतसरला आले होते. त्यामुळे शिख लोकही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते. इसवी सन पूर्व ५०० वर्षांपूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजले जाते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळत असावेत असे दिसून आले आहे. इसवी सन पूर्व २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती अशी आख्यायिका आहे. त्यामुळे बौद्ध धर्मात या दिवाळीला खूप महत्व आहे. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील चाणक्य यांच्या अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर म्हणजेच नदी किनारी मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात.

दिवाळी निबंध मराठी । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi । Diwali Crackers

सम्राट विक्रमादित्य या राजाचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी तेथील प्रजेने खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांची रोषणाई राज्यभर केली होती. प्रजेने दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला होता.जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता. ‘महावीर संवत’ त्यांच्या दुसऱ्या दिवशी सुरु होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरुवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंतरज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बहिर्ज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे.

पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना ‘ओम’ म्हणून समाधी घेतली होती. महर्षी दयानंद यांनी दिवाळीच्या दिवशीच अजमेर जवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती, मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यात ४० गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादूरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत. शाह आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत.

दिवाळी या सणाचे मूळचे नाव ‘यक्षरात्री’ असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्साययनाच्या कामसूत्रात हेच नाव नोंदलेले आहे. ‘नीलमत’ या ग्रंथात या सणाला “दीपमाला” असे म्हटले आहे. कनोजचा राजा हर्षवर्धन याने नागानंद या नाटकात या सणाला “दीपप्रतिपादूत्सव” असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात “दिवाळी” हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला “दिपालीका” म्हटले आहे, तसेच कालविवेक या ग्रंथात तिचा उल्लेख “सुखरात्रि” असा येतो. व्रत प्रकाश नावाच्या ग्रंथात “सुख सुप्तिका” म्हणून दिवाळी ओळखली जाते.

दिवाळी आल्याचा निसर्गाला बरोबर कस काय कळतं? कसा हलकेच हवेत गारवा येतो? चोरपावलांनी हळूच मागे येऊन डोळे झाकत मिठी घालणाऱ्या सखीसारखी थंडी बरोबर पहाटे कशी आपल्या दुलईत शिरते? दसऱ्याच्या आधी नदीवर धुवून वाळवलेल्या गोधडीसारखी सगळी झाडं- पान -फुलं एकदम अशी हिरवी स्वच्छ दिसू लागतात कशी? निसर्गात दिवाळी आधी येते आणि मग ती हळूच आपल्या तनामनात उतरते, हे खरं . आपले सगळे सण निसर्गाशी नातं जोडून आहेत. म्हणूनच तर चार महिने दंगा घालणारा पाऊस हलके हलके एक्झिट घेतो आणि थंडीचे आगमन होते. दसऱ्यानिमित्त घरातील जळमटे निघालेले असतात. कोपरा कोपरा साफ झालेला असतो. पंख्यावरची, कपाटावरची धूळ झटकलेली असते.

दिवाळीनिमित्त बाजारही रंगलेला असतो. मग सुखाची साधनं घरात येतात. सर्वांच्या चेहऱ्यावर एक नवीन येत . सारा आसमंत या उत्साहात न्हाऊन जातो. घरासमोर टांगलेला आकाश कंदील, पणत्यांची रांग, फुलबाज्या, भुईचक्र, मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीला लावलेला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलाचे तोरण, दारासमोर मोठमोठ्याल्या रांगोळ्या हे सगळे पहिले कि दिवाळीला सर्व सणांची राणी का म्हणतात हे समजत. मुलं घरासमोर मातीचे छोटे-छोटे किल्ले बांधतात. घरात लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा यांचा घमघमाट सुटलेला असतो. मिठाईचे डब्बे घरी येतात.

आपला देश हा कृषीप्रधान देश. आपली संस्कृती सुद्धा सर्वांवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच कि काय वसुबारस या दिवशी आपण गाय आणि वासरू यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दूध-दुभत्यासाठी होणार गायीचा उपयोग शेतीच्या कमी बैलाची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची कृतज्ञतेने केलेली ही पूजा. धनत्रयोदशीला तिन्हीसांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणा धने-गुळाचा प्रसाद याला ही फार मोठे महत्व आहे. याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावेल जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते. नरकचतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी पहाटे उठून उटणे,सुगंधी तेल लावून मोठी साबणाने स्नान करायचे. नवीन कपडे घालून देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र मिळून केलेला फराळ खायचा. घरातील सोने नाणे, रोकड यांची पूजा केली जाते. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी केली जाते.

दिवाळी निबंध मराठी । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा, साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना, साडी भेट करतो. कार्तिक सुद्धा द्वितीयेला यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहीण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहीण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.

अशाप्रकारे दिवाळीचे तीन ते चार दिवस अगदी मजेत जातात. शाळेलाही सुट्टी असल्याने मुलेही खूप आनंदी असतात पण त्यांना शाळेच्या अभ्यासापासून सुटका मिळत नाही कारण दिवाळी चा गृहपाठ शाळेने दिलेला असतो त्यामुळे सुट्टी असली तरी अभ्यास हा करावाच लागतो. मग थोडा वेळ खेळ, थोडा अभ्यास, थोडा आराम करत दिवस जातो. काही मुले गावी जाऊन या सणाचा आनंद घेतात. रानावनात जाऊन हा दिवस सर्व परिवारासोबत साजरा करतात. गावाकडे सगळी भावंडे वर्षातून एकदा भेटतात. घरातील वातावरण उत्साहाचे असते. सारे मिळून फराळ खातात. तसेच लांब असलेल्या नातेवाईकांना भेटवस्तू, शुभेच्छा पात्र इ. देऊन आनंद व्यक्त केला जातो. घरोघरी फराळाचे डबे भरून दिले जातात. अशाप्रकारे आनंद एकमेकांना वाटला जातो.

आजकाल सगळ्यांनी गावाला एकत्र येऊन दिवाळी प्रमाण तसे कमी आले आहे. त्याऐवजी लोक आता पर्यटनस्थळी दिली साजरी करतात.शहरातल्या गजबजाटापासून दूर जावसं वाटतं आणि निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावरच दिवाळी वाटणं, हे स्वाभाविकच आहे. नातलग एकत्र येण्याचा प्रमाण शहरात तरी कमी होत चालल आहे त्यामुळे पूर्वीसारखी रंगत पाहायला मिळत नाही. दिवाळी साजरी करायची पद्धत बदलत चालली आहे. आजकाल बाजारात हवे ते पदार्थ वर्षभर उपलब्ध असतात त्यामुळे दिवाळीच्या वेळीच ते पदार्थ खाण्याच अस काही अप्रूप राहत नाही. पूर्वी नवीन कपडे घेण्यासाठी दिवाळीची वाट पाहावी लागायची तशी आता पहिली जात नाही. कधीही शॉपिंग करून आपण ते घेऊ शकतो.

अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांना प्रिय आहे. तो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे परमोच्च सुखाचा अत्यंत आनंदी सण. सुखद दीपावलीच्या अनेक आठवणी पुढे अनेक दिवस मनात रेंगाळत राहतात.

आशा आहे की दिवाळी निबंध मराठी मध्ये । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi तुम्हाला नक्की आवडला असेल. या निबंधा सोबत खालील निबंध वाचायला विसरू नका.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१.  शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२.  15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध (Best: Independence Day Essay in Marathi)

३.  निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४.  छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५.  पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६.  निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

७.  माझा आवडता प्राणी मराठी निबंध Best Essay on my favourite animal in Marathi

८. माझी आई निबंध मराठी (Top 3 Essay on my mother in Marathi)

९. माझी शाळा निबंध मराठी (Best My School Essay in Marathi for Class 6 to 9)

मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

' src=

Related articles

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

  • May 7, 2023

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

  • February 5, 2023

वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध

वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

  • January 30, 2023

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

  • January 28, 2023

माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

  • January 25, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

diwali essay in marathi | दिवाळी मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण diwali nibandh in marathi | दिवाळी मराठी निबंध बघणार आहोत. प्रत्‍येकजण सण व उत्‍सवाच्‍या माध्‍यमातुन एकत्र येऊन आपला आनंद प्रकट करत असतो. या निबंधात आपण दिवाळीचा इतीहास, त्‍यांचे महत्‍व काय आहे व दिवाळी या सणाविषयी संपुर्ण माहीती दोन वेगवेगळ्या निबंधात बघणार आहोत.   चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  

निबंध 1 (350 शब्‍दात)

भारत हा सण व उत्‍सवांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण व उत्‍सवांच्‍या  निमित्‍ताने एकत्र येऊन  आपला आनंद व्यक्त करतो असतो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा शब्‍द संस्‍कृत भाषेतुन घेतला गेला आहे.  ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दीपावली साजरी केली जाते दसऱ्यापासुनच दिवाळीची तयारी घराघरात सुरू होऊन जाते. दिवाळी संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटात आणि उत्‍साहाने  साजरी केली जाते. पण दिवाळी केवळ भारतातच साजरी केली जात नाही तर भारताबाहेर राहणारे भारतीय आणि इतर लोकही ती उत्‍साहाने साजरी करतात.

 लहान मुलांनांही हा सण खुप आवडतो. दिवाळी हा भारतातील सर्वात महत्‍वपुर्ण व प्रसिद्ध सण आहे. हा सण अमावस्‍येचा दिवशी साजरा केला जातो. अमावस्‍येच्‍या काळ्या रात्री लोक मातीच्‍या दिव्‍यांनी व आजकाल इलेक्‍ट्रीक दिव्यांनी रोशनाई करून दीवाळी साजरी करतात.  रावणाला युध्‍दात हरवल्‍यावर जेव्‍हा भगवान राम १४ वर्षानी आपल्या राज्‍यात परतले तेव्हा अयोध्‍देतील लोंकानी भगवान राम यांच्‍या स्‍वागतासाठी घरे व रस्‍ते दिवे लावुन प्रकाशित केले होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्‍णांनी नरकासुर नावाच्‍या भयानक राक्षसाचा वध केला होता व हा दिवस भगवान महाविर स्‍वामी  यांचा  निर्वान दिवसही आहे . या सर्व कारणांमुळे लोक दिवाळी साजरी करतात. 

 हा एक पवित्र हिंदु सण आहे जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक आहे . देवी देवता व राक्षसांव्‍दारे समुद्र मंथन करताना माता लक्ष्‍मी यांचा जन्‍म झाला होता असे मानले जाते. हा सण पाच दिवस साजरा केला जातो. नरक चतुदशीला सुर्यदयापुर्वी अंघोळ करणे अतिशय शुभ मानले जाते . अमावस्‍येला देवीची पुजा केली जाते व बत्‍तास्‍याचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो. लहान मुले  फटाके फोडण्‍यात व छान छान मिठाईचे पदार्थ खाऊन त्‍यांचा आनंद व्‍यक्त करतात. या दिवसात लोक एकमेंकांना भेटुन शुभेच्‍छा व फराळ देऊन त्‍यांचे स्‍वागत करीत असतात. 

दिवाळीला लोक आपल्‍या नातेवाईकांना भेटुन नविन वर्ष सुखाचे जावो ही सदीच्‍छा व्‍यक्‍त करतात व आपआपसातील असलेले मतभेद विसरून लोक हा सण साजरा करतात.  दिवाळीच्या दिवसात  बाजारपेठेत लोक मिठाई व नविन कपडे घेण्‍यासाठी गर्दी करतात. आणि आपल्‍या घराला दिव्‍यांनी सजवतात. लोक सुयास्‍तानंतर  सूर्यास्तानंतर माता लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात  आणि आरोग्‍य, धन,संपत्‍ती व सोनेरी भविष्‍यासाठी देवीला प्राथना करतात. 

दिवाळी हा सण प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यामध्‍ये आनंदाची लहर आणत असतो. हाच आनंद आपल्‍याला नविन जिवन जगण्‍यासाठी प्रोत्‍साहन देत असतो. फटाके फोडताना अतिशय सावधगिरी बाळ‍गिली पाहीजे . आपल्‍या वागण्‍यामुळे कुणालाही दु:ख पोहचता कामा नये तरच दिवाळी सण साजरा करणे अर्थपुर्ण  ठरू शकेल .  

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता व खालील दुसरा निबंध वाचायला विसरू नका . धन्‍यवाद

निबंध 2 (430 शब्‍दात) 

diwali essay in marathi

दिव्यांच्या साक्षीने दीपावलीचे आगमन होते. प्रकाशाने घरे दारे-मने उजळतात. असा 'दिवाळी' हा सण मला खूप खूप आवडतो. आश्विन अमावस्येला 'लक्ष्मीपूजन' केले जाते. आश्विन कृ.१३ तिथीला धनत्रयोदशी, आश्विन कृ.१४ या तिथीला नरक चतुर्दशी नंतर अमावस्येला लक्ष्मीपूजन, कार्तिक शु.१ तिथीला बलिप्रतिपदा (पाडवा) आणि कार्तिक शु.२ या तिथीला भाऊबीज. अशा पाच दिवसांचा हा सण असतो.

  हिंदू संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसऱ्याला रावण वध करून विजयी झाल्यानंतर प्रभू श्रीराम अयोध्येस परतले. त्यांनतर त्यांना राज्याभिषेक करण्यात आला. तो दिवस म्हणजे दिवाळीचा सण होय. घरांची स्वच्छता व सजावट, रांगोळ्यांनी सुशोभित अंगणे, झेंडू शेवंतीसारख्या फुलांची मंगलतोरणे, घरांची रंगरंगोटी, आकाशकंदील, दीपमाला या साऱ्यांमुळे वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता येते.

  आनंदोत्सवाचा प्रत्यय प्रत्येक कणांकणातून येतो. फटाके , मिठाया यातच  मुले सुटीचा व सणाचा आनंद लुटतात. नवीन कपडे, नवीन भेटी त्यांना मिळतात. अभ्यंगस्नान, उटणे, अत्तरे यांनी वातावरण दरवळते. मंदिरे आरत्या व घंटांनी निनादतात. लवकर उठून पूजा व देवदर्शन यात सर्वांना ओढ वाटते. समृध्दी व पैसा देणाऱ्या लक्ष्मीदेवतेचे मनोभावे पूजन केले जाते.

  या सर्वांच्या आनंदात गरीब बिचारे दुरून मूकपणे नेत्रसुख घेतात . गरीब मुले फटाके मिळाली नाहीत दुरून तर फटाक्यांची रोषणाई, आतीषबाजी बघून आनंद मानतात ही गोष्ट अनेकांच्या हृदयाला घरे पाडते. काही सहृदयी मात्र आपल्या आनंदात या गरिबांना, त्यांच्या छकुल्यांना समाविष्ट करून घेतात. त्यांना मिठाई, नवे कपडे, फटाके देतात . दिव्यापेक्षाही उज्वलता माणुसकीत आहे. खरे हृदय तेच जे दुसऱ्याचे दुःख समजते. भारतात अजूनही अठराविश्व दारिद्र्यात अनेक जीव खितपत आहेत.

त्यांची 'दिवाळी' कधीही उजाडत नाही तर ‘दिवाळे' अन् .... दारिद्र्याची पकड त्यांना नीट जगू देत नाही. असे विचार आले की माझे मन दिवाळीच्या आतषबाजीने जे फुललेले असते, क्षणात विझते. माझ्यातला 'मी' जागा होतो. स्वतःचे फटाकडे, मिठाई, कपडे घेऊन मी कामवाल्या मावशीचे घर गाठतो . त्यांच्या मुलाला मिठाई देतो. त्यांच्या डोळ्यात चमकणारे स्मित पाहिले की माझी खरी दिवाळी साजरी झाली, हे मनाला पटते. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे मला वाटते. परिस्थितीने लाचार असणाऱ्यांना कधी विनाकारण दुःख नशिबी येतात , तिथे मदत करावीच .

नातेवाईकांना नववर्षाची भेट म्हणून शुभेच्छा कार्ड व इतर भेटी पाठविण्याबरोबरच हे छोटे पण 'खूप मोठे' सत्कृत्य केल्यास दिवाळीचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल. वर्षातल्या येणाऱ्या सर्व सणांमध्ये दिवाळीचे महत्त्व आगळे नि वेगळे आहे. तो सण प्रत्येक घरात साजरा झाला पाहिजे. दिव्यांच्या साक्षीने मने प्रकाशायला हवीत जळायला नको, चटके सोसायला नकोत.

फटाके उडवितांना आवश्यक खबरदारी घेऊन अपघातापासून बचाव करायला हवा , ही पण महत्त्वाची बाब आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी आतीषबाजीत कानठळ्या बसणारे फटाके उडवू नयेत. तसेच फटाके बनविणाऱ्या कंपन्यांत ७० ते ८०% बालश्रमिक काम करतात. श्वसन व फुप्फुसासंबंधीच्या विकारांना बळी पडतात हे सत्य न विसरता फटाक्‍यांचा  अतिरेक टाळावा. वाचलेले पैसे गरीबाला देऊन दिवाळीचा आनंद द्यावा , हे मला वाटते.

सण कोणताही असो तो आनंद , एकी, समभाव, बंधुत्व व सुख देणारा असावा. जीवन क्षणभंगुर आहे. 'जगा अन् जगू दया' या तत्त्वावर चालायचे आहे.

' src=

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

(Top 5) दिवाळी निबंध मराठी | Diwali Essay in Marathi

मित्रांनो भारतीयांचा प्रमुख सण दिवाळी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी दरम्यान चारही बाजूंना उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळते. आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 4 उत्तम Diwali Essay in Marathi -  दिवाळी निबंध मराठी शेअर करीत आहोत.

या लेखात देण्यात आलेले दिवाळी चे निबंध 100, 200, 300, 400 शब्द प्रकारात देण्यात आलेले आहेत. यापैकी आपल्याला आवश्यक असलेला निबंध आपण घेऊ शकता आणि त्याचा उपयोग करू शकतात. तर चला  Diwali Essay in Marathi ला सुरूवात करूया. 

diwali essay in marathi easy

दिवाळी 10 ओळी निबंध - Diwali essay in marathi 10 lines

  • दिवाळी हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
  • भारतासह हा सण जगभरात राहणारे भारतीय देखील साजरा करतात.
  • दिवाळीला दिव्यांचा सण म्हणूनही ओळखले जाते.
  • दिवाळी येण्याआधी घराची व दुकानाची स्वच्छता केली जाते. 
  • दिवाळी च्या सणाला दिवे लाऊन प्रार्थना केली जाते. 
  • आम्ही दिवाळीच्या दिवशी आमची घरे रंगीबेरंगी रांगोळ्या, झेंडूच्या माळा आणि अनेक दिव्यांनी सजवतो.
  • या दिवशी स्वादिष्ट मिठाई आणि इतर छान छान पदार्थ बनवले जातात.
  • दरवर्षी दिवाळी ला माझे आई वडील मला नवीन कपडे घेऊन देतात. 
  • या दिवशी आम्ही मित्र आणि नातेवाईक मंडळींना मिठाई देतो. 
  • दिवाळी च्या सणाला कोणीही दुखी राहू नये म्हणून माझे वडील दरवर्षी गरिबांना मिठाई आणि गिफ्ट देत असतात.

दिवाळी निबंध मराठी - Diwali Essay in Marathi

(100 शब्द ) 

दिवाळी हा आपल्या भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. त्रेतायुगात भगवान श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्याच्या आनंदात अयोध्येत घरोघरी सर्वत्र दिवे लावले गेले, त्यामुळे संपूर्ण अयोध्या स्वर्गासारखी उजळून निघाली. श्री रामांचे अयोध्येतील आगमन म्हणूनच दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळीचा सण प्रत्येकासाठी आनंद घेऊन येतो, मग व्यक्ति मोठा असो वा लहान सर्वजण खूप उत्साहाने दिवाळी साजरी करतात. दिवाळी दरम्यान  शाळा, कॉलेजांना  सुट्ट्या दिल्या जातात. दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते.

दिवाळीचा सण फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेक देशांमध्ये खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. सर्वत्र दिवे आणि आकाशकंदील लावले जातात, रांगोळ्या काढल्या जातात, फटाके फोडले जातात आणि स्वादिष्ट फराळही केला जातो. 

अशा प्रकारे दिवाळी हा एक आनंदाचा उत्सव आहे जो आपल्या जीवनात आनंद, प्रेम आणि बंधुता पसरवतो.

दिवाळीचा सण निबंध - Diwali Festival Essay in Marathi

दिव्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा दिवाळी हा भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. दिवाळी सणाला भारताच्या काही भागांमध्ये ‘दिपावली’ म्हणूनही ओळखले जाते. 

भगवान श्रीराम यांनी १४ वर्षांच्या वनवासादरम्यान रावणाचा वध करून अधर्मावर विजय मिळवला आणि अयोध्येला परत आले, तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी दिवे लावले. व मान्यतेनुसार तेव्हापासूनच दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू होते. या शुभ सोहळ्यासाठी घरे आणि दुकाने स्वच्छ केली जातात, घरांना रंग देऊन त्याचे नूतनीकरण केले जाते. लोक नवीन कपडे, दागिने, दिवे, मिठाई खरेदी करतात. यादरम्यान सर्वत्र अत्यंत उत्साहाचे वातावरण असते. 

धनत्रयोदशी पासून भाऊबीजपर्यंत ५ दिवस दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली जाते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दिवाळीचे पाच दिवस प्रत्येक घरी आनंद घेऊन येतात. 

दिवाळीच्या दिवशी, लोक नवनवीन कपडे आणि दागिने परिधान करतात, घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात. घरातील खोल्या, बाल्कनी आणि बागांमध्ये दिवे आणि आकाशकंदील लावून सजावट केली जाते. यामुळे घर अगदी उजळून निघते. घरी स्वादिष्ट फराळ केला जातो. शेव, चकली, चिवडा, शंकरपाळे असा फराळ अतिशय चवीने खाल्ला जातो आणि इतरांनाही दिला जातो.

दिवाळी हा अनेक शतकांपासून संपूर्ण भारतातील लोकांद्वारे साजरा केला जाणारा आनंददायक सण आहे. दिवाळी केवळ घरांनाच नव्हे तर लोकांच्या आत्म्याला देखील प्रकाश देते. असा हा सण समाजातील लोकांना जवळ आणतो आणि आपल्यामध्ये एकतेची भावना निर्माण करतो.

वाचा> माझा आवडता सण दिवाळी निबंध

मराठी निबंध दिवाळी - Diwali Essay in Marathi

भारतात सणांची गौरवशाली परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. घरातील अंधार दूर करून दिव्यांचा प्रकाश पसरवणारी दिपावली किंवा दिवाळी सर्व सणांमध्ये सर्वात मुख्य सण आहे. 

लंका-विजयानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला परतले तेव्हा अयोध्यावासीयांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून हा उत्सव लोकप्रिय झाला. महाराज युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ याच दिवशी पूर्ण झाला होता, तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो, असेही मानले जाते. काही लोक दिवाळीला भगवान महावीरांचा निर्वाण दिवस मानतात. अशा प्रकारे दिवाळीच्या सणात प्रत्येक भारतीयाला आत्मीयता जाणवते.

दिवाळी आपल्याबरोबर स्वच्छता आणि सजावटीचा सुवर्ण संदेश घेऊन येते. दिवाळी येण्याच्या काही दिवस आधीच, लोक आपली घरे साफ करण्यास सुरवात करतात. लोक नवीन कपडे खरेदी करतात  आणि दागिनेही खरेदी करतात. घरगुती मिठाई आणि पदार्थ तयार केले जातात. अशाप्रकारे दिवाळीच्या आगमनापूर्वी सर्वत्र उत्साहाची आणि जल्लोषाची लाट उसळते.

धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत ५ दिवस दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली जाते. घरोघरी दिवे, आकाशकंदील आणि विजेचे बल्ब पेटवले जातात. फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण दुमदुमून जाते. धनत्रयोदशीला लोक धनाची आणि संपत्तीची पूजा करतात. चतुर्दशीला 'नरक चतुर्दशी' असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या असूराचा वध केला होता.

अमावास्येचा दिवस म्हणजे दिवाळीचा मुख्य दिवस. या दिवशी लक्ष्मीपूजन असते. याच दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि व्यापारी नवीन हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात. नवीन विक्रम वर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. या दिवशी लोक आपल्या नातेवाईकांना भेटतात आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते आणि त्याला मिठाई खाऊ घालते. भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतो.

काही लोक दिवाळीच्या दिवशी पत्ते खेळतात. दिवाळीत खूप फटाके फोडले जातात. यामुळे काहीवेळा भीषण आग लागण्याच्या घटना घडतात. म्हणून आपण फटाके फोडताना काळजी घेतली पाहिजे.

दिवाळीच्या प्रकाशाने आपले घर, अंगण आणि त्याचबरोबर आपले मनही उजळून निघते. आपल्या हृदयातून दुसऱ्यांबद्दल असलेला राग, द्वेष आणि दुरावा काढून टाकला जातो. आपले मन प्रेमाने भरले जाते. यातून सर्वांना नवचैतन्य प्राप्त होऊन आपली कर्तव्ये पार पाडण्याचे बळ मिळते.

हे दीपमालिके, आनंद आणि प्रकाशाची देवी! तुझे नेहमीच स्वागत आहे!

दिवाळी मराठी निबंध - Diwali Composition in Marathi

कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा होणारा दीपावली हा सण केवळ हिंदू धर्मासाठीच नाही तर जैन, बौद्ध, शीख इत्यादी धर्मांसाठीही महत्त्वाचा आहे. हा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आणि सांस्कृतिक श्रद्धा आहेत.

आपल्या देशातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक, दीपावली किंवा दिवाळी म्हणजे पाच दिवसांचे महापर्वच आहे, हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेपर्यंत चालतो, या सर्व दिवसांचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे, यामागे पौराणिक आणि धार्मिक कथा जोडल्या आहेत.

दिवाळीच्या दिवशी लोक आपली घरांची, दुकानांची साफ-सफाई करतात. घरांना रंग लावतात आणि या निमित्ताने नवीन कपडे, भेटवस्तू, भांडी, मिठाई इत्यादी खरेदी करतात. नवीन दुकाने आणि घरे घेण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवाळी एक शुभ दिवस मानला जातो.  Diwali Essay in Marathi

दिवाळीच्या पहिल्या दिवशी येते धनत्रयोदशी. हा दिवस घरासाठी काही खरेदी करण्याचासाठी शुभ मानला जातो. या दिवशी धनाची पूजा केली जाते आणि लोक सोने, चांदी यांचीही खरेदी करतात. लोक हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही अनुकूल मानतात.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला होता. हा वध अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे.

तिसरा दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा. हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी लोक रांगोळी आणि दिव्यांनी घर सजवून संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि गणेश ही शुभ सुरुवातीची देवता मानली जाते.

दिवाळीला लोक रस्ते, बाजारपेठा, घरे आणि आजूबाजूच्या परिसरात समृद्धी आणि कल्याणासाठी मातीचे दिवे लावतात.

यावेळी फटाके हे प्रमुख आकर्षण असते. घरात बनवलेला स्वादिष्ट फराळ खाल्ला जातो आणि शेजारी, मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना सुद्धा दिला जातो. 

लक्ष्मीपूजनाच्या रात्री १२ वाजेपर्यंत लोक लक्ष्मीच्या दर्शनासाठी आतुरतेने घराचे दरवाजे उघडे ठेवतात.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा आणि गोवर्धन पूजेचा दिवस.

याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने इंद्राचा पराभव केला आणि इंद्र पाडत असलेल्या मुसळधार पावसापासून ग्रामस्थ आणि गुरेढोरे यांना वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या एका करंगळीवर उचलला होता. 

उत्तर भारतात सायंकाळी खत, ऊस, पुस्तके, शस्त्रे व उपकरणे इत्यादींची पूजा या निमित्ताने केली जाते.

महाराष्ट्र, तमिळनाडू आणि कर्नाटकातील लोक हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा करतात ज्यात भगवान श्रीविष्णूंच्या  वामन अवताराने राक्षस राजा बळीवर मिळवलेल्या विजयाची आठवण काढली जाते.

भाऊबीजेचा दिवस हा दिवाळीचा शेवटचा दिवस. हा दिवस भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक आहे. बहीण आपल्या भावाचे औक्षण करते आणि त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतात.

दिवाळीचा सण देशभरातील सर्व लोक अतिशय उत्साहाने साजरा करतात. मुलांना सणाचा आनंद लुटता यावा म्हणून शाळा, महाविद्यालयात काही दिवस सुट्टी दिली जाते. बँका नवीन योजना आणि व्याजदर देतात. दरवर्षी या निमित्ताने मोठ्या बजेटचे नवीन चित्रपट प्रदर्शित होतात.

दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. यामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे आपण फटाके फोडताना कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

दिवाळी हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या हृदयातून दुसऱ्यांबद्दल असलेला राग, द्वेष आपण काढून टाकला पाहिजे आणि सर्वत्र प्रेम आणि आनंद पसरवला पाहिजे. 

तर मित्रहो वरील लेखात आम्ही आपल्यासाठी 4 वेगवेगळी शब्ददमर्यादा असणारे दिवाळी मराठी निबंध दिले आहेत. आशा आहे हे  Diwali Essay in Marathi आपणास उपयोगी ठरले असतील.  diwali festival essay in marathi   आपण आपल्या शालेय कार्यासाठी उपयोगात घेऊ शकतात. तसेच परीक्षेत देखील आपणास दिवाळी सण मराठी निबंध विचारला जातो, तर तेथे देखील हा निबंध उपयोगी ठरू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

  • Photogallery
  • Marathi News
  • career news
  • How To Write An Essay On Diwali Festival Want To Write An Essay On The Diwali Festival This Ready To Write Essay Will Make Your Work Easier

Diwali Essay : दिवाळी सणावर निबंध लिहायचा आहे; असा निबंध लिहिलात तर सगळेच करतील कौतुक

Diwali festival essay: सध्या सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी पडली असून, बच्चेकंपनी दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. मात्र, या सुट्टीतही घरच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांची पाठ सोडलेली नसते. शाळांमधील विविध उपक्रम आणि अभ्यासाबरोबर 'दिवाळी' सणावर निबंध लिहिणे हा ठरलेला अभ्यास असतो. अशा सगळ्यांसाठी दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि संपूर्ण माहिती सांगणारा निबंध. हा निबंध सुट्टीनंतर तुमचे कौतुक करण्यास कारणीभूत ठरू शकतो..

Diwali Essay

महत्वाचे लेख

CMC Chandrapur Recruitment 2023: चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात भरती, या पदांसाठी आजच करा अर्ज

Majha Nibandh

Educational Blog

eassy on diwali in marathi

दिवाळी वर निबंध विद्यार्थ्यांसाठी | Essay on Diwali in Marathi 2024.

दीपावली निबंध मराठीत / diwali nibandh in marathi 2024..

माझा आवडता सण दिवाळी आहे, मला सगळेच सण आवडतात पण दिवाळी हा सण मला खूप जास्त आवडतो. दिवाळी जवळ आली की खूप कामे असतात, पण त्यामध्ये वेगळीच मजा असते.

दिवाळीच्या सुट्टी दिवशी आई वेगवेगळे पदार्थ बनवते जसे की शंकरपाळी, चिवडा, चकली, लाडू, शेव, अनारसे अजून खूप काही, फराळ बनवताना मी आईला मदत करते. आईसोबत मी सर्व घर स्वच्छ करू लागते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन घरातील सगळे लक्ष्मीची पूजा करतात.

Essay on Diwali in Marathi

घरामध्ये फुलांनी पूर्ण घर सजविले जाते. वेगवेगळ्या रंगाची लाइटिंग केली जाते. दारोदारी पणत्या लावल्या जातात. घर खूप सुंदर दिसते घराच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढली जाते, मनमोहक दृश्य तयार होते.

सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे फटाके, वेगळे वेगळे फटाके घेतले जातात जसे की पाऊस, लवंगी फटाके, चिमणी बॉक्स, लक्ष्मी बॉम्ब लहान मुले खूप फटाके वाजवतात, त्यांना खूप आनंद होतो सारखे एकटे तिकडे पळतात. त्यांना गावाकडून पाहुणे येतात खूप मजा येते दिवाळी मध्ये सगळ्यांना नवीन कपडे घेतले जातात.

Essay on Diwali in Marathi

दिवाळी हा सण खूप आनंद देणारा आहे दिवाळी दिवशी बाहेर गावी गेलेले सर्व नातेवाईक घरातील सर्व मंडळी एकत्र येतात. दिवाळी दिवशी सर्व आनंदाने बागडत असतात दिवाळी सण नात्यांमधील प्रेम वाढवणारा सण आहे. गोड फराळ, गोड बोलणं, गोड मैत्री, आणि आपल्या लोकांच्या प्रेमाचा संगम आहे.

सोपा दिवाळी वर मराठी निबंध / Essay on Diwali in Marathi.

दिवाळी जवळ येताच लोकांच्या आनंदाला हर्षाला सीमा राहत नाही, नवी दोन चाकी, नवी चार चाकी गाडी, ट्रॅक्टर शेती विषयक अवजारे नवीन जमीन खरेदी, दुकानाचे उद्घाटन, भूमिपूजन ही सर्व शुभकार्ये दिवाळी दिवशी आटोपली जातात, कारण वर्षातून एकदा येणारा दिवाळीचा सण हा जणू एक शुभमुहूर्त असतो.

सोनेखरेदी घरातीलएखादी महत्वपूर्ण काम हाती घेणे ही सर्व कामे सुद्धा दिवाळी दिवशीच पार पाडली जातात. बाजारामध्ये लोकांची खरेदी करण्यास गर्दी होऊ लागते, फटाके खरेदी करणे, नवीन कपडे खरेदी करणे, संसार उपयोगी नवीन साहित्य खरेदी करणे, घराला तोरण खरेदी करणे, फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन इत्यादी सर्व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी सुद्धा दिवाळी दिवशी केली जाते.

तसे पाहिले तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत पण सर्वात जास्त महत्त्व दिवाळी या सणालाच दिले जाते, जितका आनंद दिवाळी या सणाला होतो तितका आनंद दुसऱ्या कोणत्याच सणाला होत नाही. घरामध्ये जर कोणी लहान असतील तर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. कारण घरातील मोठी व्यक्ती भाऊ वडील मम्मी ताई या त्यांच्यासाठी त्यांना कपडे भेटवस्तू फटाके विकत घेणार असतात.

दिवाळीचा आनंद जवळजवळ आठवडाभर उतरत नाही आणि दिवाळी दिवशी बनवलेला फराळ तर महिनाभर संपत नाही, इतके गोड तिखट पदार्थ दिवाळीला बनवले जातात म्हणून दिवाळी हा सण आम्हा घरातील सर्व लहानथोरांना सर्वात जास्त आवडतो.

घरातले सगळे आनंदित असतात नवीन गोष्टी विकत घेतल्या जातात. शोपीस लावले जातात, घरामध्ये दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा सगळे सोबत असतात गप्पागोष्टी रंगलेले असतात लहान मुलांचे खेळणे चालु असते फटाके वाजवत असतात मला खूप भारी वाटत असते नंतर तिसरा दिवस म्हणजे भाऊबीज या दिवशी भावाला उटणे लावून अंघोळ घातली जाते नंतर ओवाळले जाते.

Essay on Diwali in Marathi

भावाकडून गिफ्ट भेटते म्हणून खूप आनंद होतो. आई मामाकडे घेऊन जाते भाऊबीजेला आनंद आनंदी वाटत असते. सगळ्यांच्या घरोघरी पदार्थ खायला भेटतात, जणूकाही मेजवानी असल्यासारखे वाटते, अशा प्रकारे दिवाळी हा सण खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. आपल्या भारत देशामध्ये दिवाळी हा सण खूप आनंदाने साजरा केला जातो. नातेवाईक व शेजारी लोकांना फराळाला बोलवले जाते, त्यामुळे मला दिवाळी सण खूप आवडतो.

Note : मित्रांनो जर तुम्हाला “ Essay on Diwali in Marathi ” हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर जरूर शेयर करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

GETMARATHI

diwali essay in marathi 10 lines!! दिवाळी निबंधात या साध्या सोप्या ओळी!!

   दिवाळी हा सण हिंदूंचा असला तरी सर्व हा दिवस अगदी आनंदाने केला जातो.दिवाळी निमित्त आपण (diwali essay in marathi 10 lines) शाळेत ठेवलेलं निबंध त्यासाठी काही महत्वाच्या लाईन्स आहेत. दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण आहे.

दिवाळी हा एक हिंदू सण आहे जो भारत, नेपाळ, युनायटेड, कॅनडा इंडोनेशिया अशा काही देशात दिवाळी हा सण अगदी आनंदाने  साजरा केला जातो.

अंधारावर प्रकाशाचा विजय वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो.

दिवाळी शरद ऋतूतील विषुववृत्तीला कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते, जी ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये येते.

  शाळेतील मुलांसाठी 10 ओळी निबंध(diwali essay in marathi 10 lines)

  !माझ्या तर्फे दिवाळीच्या सर्वांना भरभरून हार्दिक शुभेच्छा!

  • दिव्यांचा सण 2022 

दिवाळी 2022हा एक दिव्यांचा सण आहे आणि आनंदाचा देखील लहान मुले तर या दिवसाची वाट बघत राहिलेले असतात 

Diwali हा दिव्यांचा सण आहे आणि तो हिंदू, जैन आणि शीख यांनी साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे.

  • दिवाळी - kalnirnay

यावर्षी, दिवाळी 24 ऑक्टोबर 2022 (सोमवार) रोजी धनत्रयोदशीनंतर 22 ऑक्टोबर (शनिवार) आणि छोटी दिवाळी 23 ऑक्टोबर (रविवार) रोजी साजरी केली जात आहे.24 (सोमवार)ऑक्टोबर छोटी दिवाळी आणि मोठी दिवाळी.

25 ( मंगळवार) ऑक्टोबर गोवर्धन पुजा आणि  26 ऑक्टोबर बुधवार  या दिवशी भाऊबीज अशीच दिवाळी ही पाच दिवसाची असते.

  •  दिवे ,मेणबत्त्या

या दिवशी लोक आपल्या घरात मेणबत्त्या, दिवे लावतात.  सर्वजण दिवाळी  या सणाला मेणबत्त्या तर लावतात परंतु ते का लावतात त्यामुळे ,लावण्याची कारण काय आहे हे माहीत असणे गरजेचे आहे.

जर आपण एखादा  सण-उत्सव करत असाल तर त्याची पूर्ण माहिती असणे अत्यावश्यक असते.

सर्व लोक दिवाळी तर करतात परंतु ती दुसरे लोक शेजारील लोक व्यक्ती करतात म्हणून ते करतात परंतु त्यांना या सणांचे महत्त्व किंमत माहिती नसते.

प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून आयोध्या नगरीत पोहोचले होते त्यामुळेसुद्धा एक दिवे लावण्याची प्रथा पडली. 

 दिवाळी या सणाला लावण्या मागचे मोठी कारण म्हणजे दिवा ही एक सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे प्रत्येक घरी हा दिवा लावल्यानंतर नकारात्मक ऊर्जा नष्ट  होते आणि  सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश पूर्ण आपल्या जवळच्या परिसरात पसरतो आणि नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे नष्ट होते त्यामुळेसुद्धा दिवाळी हा सण आला की लोक नवीन वर्ष सुद्धा म्हणतात.

  • प्रभू राम  

भारतामधील सर्वात मोठ्या सणांपैकी हा एक सण म्हणजेच दिवाळी दिवाळी हा सण भगवान रामाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते ते चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत  परतले होते.

  •   फुलझाड

दिवाळीच्या प्रसंगी, अनेक कुटुंबे संध्याकाळच्या अंधारात प्रकाश आणण्यासाठी फुलझारी (चमकदार) वापरतात. फुलझरी, सर्वात लोकप्रिय, चमकदार आकार आणि सोनेरी, लाल, चांदी आणि इतर अनेक रंगांमध्ये येतो.

दिवाळी 2022- रांगोळी

दरवर्षी, लोक वेगवेगळ्या रंगीबेरंगी रांगोळी डिझाइन करून घरे ऑफिस कार्यालय कामाची जागा सजवतात. 

या दिवशी काही लोक रंगीबिरंगी फुलांच्या पाकळ्याचा वापर करून उत्कृष्ट अशी रांगोळी देखील काढतात. 

कपडे घालण्याची परंपरा आणि दागिने 

दिवाळीच्या पूजेसाठी नवीन कपडे आणि दागिने घालण्याचीही परंपरा आहे.

दिवाळी म्हटली की सर्वांना कपडे  नवीन  दागिने घेणे असा विचार करत बसलेली असतात. 

लक्ष्मीपूजन दिवशी नवनवीन दागिने नवीन नवीन वस्तू खरेदीत सुद्धा केल्या जातात असे मानले जाते की नाही लक्ष्मीपूजन दिवशी नवनवीन वस्तू खरेदी करावे. 

  • धनत्रयोदशी (Dhanteras or Dhan Trayodashi)

22 ऑक्टोबर हा दिवस धनत्रयोदशी हा दिवस देवांनी आणि असुरांनी केलेल्या समुद्र-मंथनातून आलेले देव धन्वंतरी यांचा जन्म झाला होता.

22 ऑक्टोबर चा हा दिवस लोक वैद्य देव धनवंती यांची आणि लक्ष्मी देवीची पूजा देखील करतात. 

धनत्रयोदशी, पाच दिवसांच्या दिव्यांच्या उत्सवाचा पहिला दिवस, नवीन धातूच्या वस्तू, विशेषतः सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी आणि आणण्यासाठी चांगला दिवस मानला जातो.

(diwali essay in marathi 10 lines)पर्यावरणपूरक दिवाळीवर लहान आणि सोपे मराठी निबंध टिपा आणि कल्पना

दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे लोक दिवाळी आल्यामुळे सफाईमध्ये व्यस्त आहेत. 

 लक्ष्मीपूजन दिवशीच्या लक्ष्मीमातेच्या स्वागतासाठी  सर्वजण आपली घरे फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजवत आहेत.

अनेकजण दिवाळीचा संबंध फटाके फोडण्याशी जोडतात, तर त्यामुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होते.

दिल्लीत सरकारने दिवाळीच्या दिवशी सर्व प्रकारच्या  ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण करणाऱ्या सर्व फटाक्यांवर बंदी घातली आहे, तर पंजाबने 24 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते रात्री 10 या दोन तासाची मुभा दिली आहे.

24 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमध्ये कालीमातेच्या पूजेदरम्यान काही फटाक्यांना परवानगी आहे. 

हरियाणाने काही फटाक्यांवर बंदी घातलेली आहे.

विद्यार्थ्यांना प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना 'फटाक्यांना नाही म्हणा' आणि 'पर्यावरणपूरक प्रदूषण विरहित दिवाळी दिवाळी कशी साजरी  करता येईल' यासारख्यासंमत संबंधित विषयांवर दिवाळी भाषण आणि निबंध लिहिण्यास सांगितले जाते सांगायला पाहिजे.

 ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे काय परिणाम होतात हे सुद्धा त्या विद्यार्थ्यांना मुलांना समजावून सांगितले पाहिजे.

विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट केव्हा कळते आणि कशी समजते ते त्यांच्या शिक्षकांनाच माहीत असते आणि आई-वडिलांना सुद्धा होईल असते त्यामुळे प्रदूषण विरहीत दिवाळी करण्याचे काम हे आई-वडील आणि शिक्षकांवर सुद्धा  अवलंबून असते.

शिक्षक जर पूर्णपणे विद्यार्थ्यांना दिवाळी  दिवाळी फटाके या पासून होणारे दुष्परिणाम आणि त्यापासून होणारे नवनवीन विकार आणि त्यापासून मृत्यू पावत असलेल्या व्यक्ती अशा सर्व गोष्टींची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या मुलांच्या पद्धतीने सांगितल्यावर हे नक्की यशस्वी होईल.

     

दिवाळी निबंध  टिपा आणि कल्पना ( diwali essay in marathi 10 lines for class 5) :.

Diwali 2022 निबंध टिप्स

दिवाळीचे भाषण लहान ठेवावे कारण विद्यार्थ्यांना मोठे निबंध /भाषण शिकता समजत समजत नाही किंवा ते समजून घेण्यास त्यांची मानसिकtaa नसते त्यामुळे भाषण हे लहान आणि लहान मुलांना वाचण्याजोगे  करावे. 

दिवाळीचे भाषण विद्यार्थ्यांना आठवणार असे अवघड शब्दांचे भरू नका त्यांना समजेल अशी भाषा त्या भाषणात  वापरा म्हणजे त्यांना ते समजून बोलणे एकदम सोपे होईल आणि ते न अडखळता बोलू शकतील.

निबंध लिहण्याचा सराव करावा भाषणाचा सराव करावा.

दिवाळी, दिव्यांचा सण, वाईटावर चांगल्याचा विजय.

अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी केली जाते. हे लक्ष्मण आणि सीतेसह प्रभू राम अयोध्येला परत आली.

त्यांच्या परत याचा आनंद साजरा करण्यासाठी, अयोध्येतील स्वतःची लोकांनी स्वच्छ केली आणि फुलांनी सजवलेले होते.त्यांचे परतीचे स्वागत करण्यासाठी दिवे लावले. तेव्हापासून हा दिवसदिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला.

दिवाळी या शब्दाचा उगम संस्कृत शब्द खोल (दीप) आणि वाली (पंक्ती) पासून झाला आहे.

याचा शाब्दिक अर्थ कसा आहे"दिव्यांची पंक्ती".

(Diwali 2022 marathi) हा सण पाच दिवसांचा उत्सव आहे जो सुरू धनत्रयोदशीपासून होतो आणि भाऊबीज पर्यंत चालतो.

दिवाळी साजरी करण्यासाठी लोक आपली घरे दिवे, रांगोळ्या आणि दिव्यांनी सजवतात.

आपण फटाक्यांचा वापर नाही केला पाहिजे आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रदूषणविरहित प्रदूषण दिवाळी साजरी केली पाहिजे. 

पर्यावरणपूरक दिवाळी हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यास मदत करते. 

फटाक्याचा मोठा आवाज झाल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोक आणि कुत्रे आणि इतर प्राण्यांना त्रासदायक देखील ठरू शकतो.

10 Reasons Why Celebrate Diwali (diwali essay in marathi 10 linesदिवाळी का साजरी करतो याची 10 कारणे)

दिवाळी हा हिंदू सण मानला जात असला तरी देशभरात विविध समुदायांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो.

दिवाळी हा प्रकाशाचा सण का साजरा करतो? 

Diwali 2022 हा संपूर्ण भारतात देशात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा (दिवे)प्रकाशमय सण म्हणून ओळखला जातो.

दिवाळी किंवा दीपावली कार्तिक महिन्यात साजरी केली जाते आणि हा सण साधारणपणे पाच दिवस चालतो, धनत्रयोदशीपासून सुरू होतो. त्यानंतर नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी), लक्ष्मी पूजन (मोठी दिवाळी), गोवर्धन पूजा आणि भाई दूज.

प्रत्येक भागात दिवाळी ही अगदी हर्ष उल्हासाने साजरी केली जाते प्रत्येकाच्या घरात कोपऱ्यात मातीचे दिवे लावून साजरी केली जाते. 

दिवाळी हा हिंदू सण मानला जात असला तरीही देशभरात विविध समुदायांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. 

दिवाळी कुठेही साजरी करीत असले तरी दीपावलीचा आध्यात्मिक संदेश एकच राहतो जो ‘अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा’ आणि वाईटावर चांगल्याचा आहे विजय होत असतो.

 1.भगवान श्रीकृष्णाने नरकासुर वध 

भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला.

कारण तो प्राग्ज्योतिषपुराचा दुष्ट राजा होता आणि त्याने 16,000 मुलींना कैदेत ठेवले होते त्यामुळे त्याचा वध केला होता. 

भारताच्या उत्तरेकडील भागात, दक्षिणी तमिळ आणि आसाम, नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी) हा दिवस म्हणून ओळखला जातो ज्या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला.

 2.प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण अयोध्येला परतणे

दिवाळी म्हणजे वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय आणि प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्यानंतर झालेला उत्सव. 

हिंदू रामायणानुसार, भगवान राम, त्यांची पत्नी सीता त्यांचा भाऊ लक्ष्मण हे राजा रावणाचा पराभव केल्यानंतर प्रभू श्रीराम 14 वर्षांनी अयोध्येला परतले होते.

 3.देवी लक्ष्मीचा पुनर्जन्म

देवांनी आणि असुरांनी केलेल्या समुद्र मंथनमध्ये जन्म झालेल्या लक्ष्मीच्या पुनर्जन्माला अनुसरून दिवाळी साजरी केली जाते. 

देव आणि दानवांनी केलेल्या दुधाच्या वैश्विक समुद्राचे मंथन होते.

(कथेनुसार)प्रचलित मान्यतेनुसार, लक्ष्मीच्या जन्मानंतर त्रिमूर्ती यांनी ठरवले की  विवाह करण्याचा अधिकार लक्ष्मी देवीचा आहे त्यामुळे दिवाळीच्या रात्री लक्ष्मीने विष्णूला आपला पती म्हणून निवडले आणि त्याच्याशी लग्न केले.

 4.पांडवांचे हस्तिनापूरला परतणे

मामा शकूनी यांनी ठरवलेली पैज हरण्यात फसलेल्या पाच पांडव बंधूंना कौरव बंधूंनी 12 वर्षांसाठी पांडवांना हद्दपार केले होते.

महाकाव्य महाभारतानुसार, कार्तिक अमावस्येला पांडव हस्तिनापुर राज्यात परतले होते.

 5.बंदी चोर दिवस

शीख धर्मात दिवाळी हा सण ऐतिहासिक घटना म्हणून साजरा केला जातो. सहावे शीख गुरू, गुरु हरगोबिंद, इतर 52 हिंदू राजांसह, मुघल सम्राट जहांगीरच्या कैदेतून दिवाळीच्या मुहूर्तावर मुक्त झाले.

 6.कापणीचा हंगाम 

एक लोकप्रिय समज अशी आहे की, जो हिवाळ्याच्या हंगामापूर्वी वर्षातील शेवटचा हंगाम दर्शवितो.

दिवाळी हा सण लोकप्रिय आहे त्यामुळे लोकांची अशी समजूत आहे की दिवाळी हा सण म्हणजे वर्षातील शेवटचा हंगामा होय.

शेवटचा हंगाम म्हणजे  हिवाळ्याच्या हंगामा कापणीचा  शेवट म्हणजे थंडी पूर्वी कापणी पूर्ण होते.

 7. काली पूजा

नरक चतुर्थी दिवशी काली पूजा केली जाते. 

diwali essay in marathi 10 lines

शक्ती धर्माच्या कलिकुल पंथ नुसार, कमलात्मिकाच्या अवताराचा दिवस महाकाली च्या अवताराचा दिवस,

देवी महाकालीचे शेवटचे अवतार देखील कमलात्मिका काली जयंती म्हणून साजरी केली जाते आणि ती दिवाळीच्या दिवशी येते. 

या दिवशी  काली  मातेची पूजा केल्यानंतर शत्रूवर विजय मिळवण्याचा आशीर्वाद मिळतो

काली पूजा ओडिशा,पश्चिम बंगाल,चितगाव, मिथिला, सिल्हेट आणि महाराष्ट्रातील टिटवाळा या प्रदेशात साजरी केली जाते.

 8.महावीर निर्वाण दिवस

जैन धर्मातील भगवान महावीरांचे निर्वाण बहात्तर (वयात)वर्षानंतर झाले होते. 

भगवान महावीरांच्या आत्म्याच्या निर्वाणाच्या वर्धापन दिनानिमित्त दिवाळी हा सण साजरा केला जातो. 

वैश्विक युगातील चोविसावे व शेवटचे जैन तीर्थंकर होते. 

महान भगवान महावीरांनी कार्तिक महिन्याच्या चतुर्दशीला मोक्ष (मुक्ती) प्राप्त केली.

 9.दिवाळी नवीन वर्ष म्हणून साजरी केली जाते

भारतातील उत्तर हिंदू समुदायांमध्ये आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये दिवाळी हा सण देखील नवीन वर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक मानली जाते.

नवीन वर्ष का? तर दिवाळीनंतर वाईट गोष्टींचा (नकारात्मक गोष्टी सकारात्मक) नाश होतो चांगल्या गोष्टीची सुरुवात होते त्यामुळे दिवाळीपासून नववर्ष सुद्धा म्हटले जाते.

 10.विष्णूने देवी लक्ष्मीची सुटका केली

 भगवान विष्णूने लक्ष्मीची देवीची  दैत्यराज बळीच्या तुरुंगातून मुक्त केले होते.

 या दिवशी भगवान विष्णूच्या आदेशानुसार असुरांचा राजा बळी भूतकाळावर राज्य करण्यासाठी हद्दपार करण्यात आले होते.

दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण सर्वांनी आनंददायी जावो अशा आमच्या परिवाराच्या वतीने तुम्हाला सर्वांना भरभरून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

दिवाळी निमित्त निबंध (diwali essay in marathi 10 lines) लिहण्यासाठी आपण या दिलेल्या गोष्टीचा लाईन्स वापर करून  तुम्ही  निबंध उत्कृष्ट लिहू शकता .

You might like

Post a comment, contact form.

infinitymarathi

  • मराठी निबंध
  • उपयोजित लेखन
  • पक्षांची माहिती
  • महत्वाची माहिती
  • भाषणे
  • कोर्स माहिती

दिवाळी निबंध मराठी 10 ओळी 2023 | Diwali essay in Marathi 10 lines

दिवाळी निबंध मराठी 10 ओळी 2023 | diwali nibandh in marathi | 10 lines essay on diwali in marathi.

Diwali essay in Marathi 10 lines : भारत हा देश विविधते मध्ये एकता असणारा देश आहे. भारत हा देश सणांनचा देश म्हणून ओळखला जातो. भारत या देशांमध्ये सर्वे सण मिळून मिसळून साजरे करतात.

त्यापैकी दिवाळी हा सण सर्वात मोठा मानला जातो.दरवर्षी दिवाळी हा सण सर्व भारतवासीय मोठ्या उत्साहाने  व आनंदाने साजरे करतात.

दिवाळी म्हटले की सर्व वातावरण आनंदाची असते सर्वीकडे उत्साह बाजारपेठा गर्दीने भरलेल्या असतात. हा सण सर्वांचा आवडता सण असतो. विद्यार्थ्यांना दरवर्षी दिवाळी  वर निबंध Diwali essay in Marathi 10 lines  लिहिण्यास सांगितले असते त्यानिमित्य विद्यार्थ्यांसाठी 

आजच्या या लेखामध्ये आज आम्ही दिवाळीनिमित्त निबंध Diwali nibandh in Marathi 10 lines घेऊन आलेलो आहोत. हा निबंध वर्ग पाच ते सहा सात आठ नऊ दहा चे विद्यार्थी आपल्या अभ्यासासाठी वापरू शकता. दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

तर चला मग सुरु करूया दिवाळी वर निबंध दहा ओळीचा Diwali essay in Marathi 10 line.

माझा आवडता सण दिवाळी १० ओळी मराठी निबंध | Maza Avadta San Diwali nibandh marathi 10 lines

Team infinitymarathi

Posted by: Team infinitymarathi

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, telegram group.

Telegram Group

  • essay in marathi
  • information in marathi
  • marathi speech
  • course information in marathi
  • advertising in Marathi

गैरवर्तनाची तक्रार करा

हा ब्लॉग शोधा.

  • एप्रिल 2024 3
  • मार्च 2024 25
  • जानेवारी 2024 2
  • डिसेंबर 2023 1
  • नोव्हेंबर 2023 4
  • ऑक्टोबर 2023 3
  • ऑगस्ट 2023 2
  • जून 2023 1
  • मे 2023 1
  • एप्रिल 2023 1
  • फेब्रुवारी 2023 2
  • जानेवारी 2023 2
  • ऑक्टोबर 2022 1
  • मे 2022 4
  • एप्रिल 2022 1
  • मार्च 2022 3
  • फेब्रुवारी 2022 5
  • जानेवारी 2022 1
  • डिसेंबर 2021 2
  • नोव्हेंबर 2021 2
  • ऑक्टोबर 2021 2
  • सप्टेंबर 2021 3
  • ऑगस्ट 2021 6
  • जुलै 2021 5
  • जून 2021 8
  • मे 2021 16
  • मार्च 2021 2
  • फेब्रुवारी 2021 6
  • जानेवारी 2021 1

Social Plugin

Follow us on google news.

  • https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3

Featured Post

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

click here to get information

Menu Footer Widget

  • Privacy policy
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

माझा आवडता सण दिवाळी वर निबंध | Maza Avadta San Diwali Nibandh

Maza Avadta San Diwali Nibandh: सण हे आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. आपल्या जीवनात आनंद आणतो. सण साजरे करण्यामागे एक इतिहास आणि स्वतःचे महत्त्व आहे.

माझा आवडता सण दिवाळी वर निबंध – Maza Avadta San Diwali Nibandh

Table of Contents

माझा आवडता सण दिवाळी वर निबंध-Maza Avadta San Diwali Nibandh

माझा आवडता सण दिवाळी लहान निबंध – Short Essay on My Favourite Festival Diwali in Marathi

दिवाळीचा सण मोठा आनंदाला नाही तोटा असे आपण नेहमीच म्हणत असतो. दिवाळीचा सण म्हणजे लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच आनंदाची पर्वणी असतो. हा सण प्राचीन काळापासून आपल्या भारतात साजरा करतात. आज कित्येक परकीय लोकही दिवाळी साजरी करतात.

दिवाळीच्या या सणाला ऐतिहासिक परंपरा आहे. प्रभूरामचंद्रांनी विजयादशमी दिवशी रावणाचा वध केला आणि सीतेसह पुष्पक विमानातून अयोध्येला परतले. प्रजेने सगळीकडे दीप उजळले. तो हाच दिवस. आजही दिवाळीदिवशी लोक दीप लावतात. आकाश कंदील लावतात. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सारेच आनंदात सामील होतात. फटाके, फुलबाजे लावून आपला आनंद व्यक्त करतात.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. सगळेजण अभ्यंगस्नान करुन मनोभावे लक्ष्मीची पूजा करतात. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, तो हाच दिवस. आश्विन शुद्ध चतुर्दशीला नरकचतुर्दशी साजरी करतात. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येदिवशी व्यापारी लोक मोठ्या थाटामाटाने लक्ष्मीपूजन करतात.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा धर्मनिष्ठ व उदार बळीराजाने या दिवशी यज्ञ करून प्रतिकारशक्ती मिळवली होती. भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. भाऊ आपल्या कुवतीप्रमाणे बहिणीला आहेर करतो. काहीतरी भेट देतो. दिवाळीचा फराळ तर पहिल्या दिवसापासून चालूच असतो.

हे पण वाचा – दिवाळी सणाची माहिती मराठीत

Maza Avadta San Diwali Yavar Nibandh – माझा आवडता सण दिवाळी या विषयावर निबंध मराठी (लहान निबंध)

HAPPY DIWALI WALLPAPER

दिवाळी हा एक भारतीय हिंदू सण आहे जो दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, हा सण कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी येतो. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा हा एक शुभ सण आहे. हा दिव्यांचा सण आहे.

दिवाळीच्या काही दिवस आधी फटाके आणि मिठाईने उत्सव सुरू होतो. प्रत्येक घरात सर्वत्र दिवे दिसू लागतात. प्रत्येक घरात दिवे आणि फटाके ठेवले जातात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सणाचा आनंद घेतात. भगवान रामाने मारलेल्या दुष्ट मनुष्य रावणाच्या मृत्यूचे प्रतीक दिवाळी. हा दिवस असा मानला जातो की जेव्हा चांगले वाईटावर यशस्वी होते.

मला दिवाळीचा सण आवडतो कारण दिवस दिव्यांनी भरलेला असतो आणि मला फटाके आणि दिवे लावायला आवडतात. सकाळी लवकर आंघोळ करून नवीन कपडे घालतो. या दिवशी घरी खूप मिठाई आणि स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. सर्व दुकाने आणि बाजारपेठा रोषणाईने सजल्या जातात. प्रत्येकजण आपापल्या घरी मेणबत्त्या आणि दिवे लावतात.

लोक या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि चांगली संपत्ती, समृद्धी आणि भाग्यासाठी प्रार्थना करतात. दिवाळी हा काही एका दिवसाचा उत्सव नाही. उत्सवाची तयारी महिनाभर आधीपासून सुरू होते. सौभाग्य आणि संपत्ती प्रदान करण्यासाठी देवी लक्ष्मीला आमच्या घरी भेट देण्यासाठी आम्ही आमची घरे स्वच्छ करतो. आम्ही मिठाई, हलके दिवे आणि फटाके देखील तयार करतो. प्रत्येकाला दिवाळी साजरी करायला आवडते कारण यामुळे मनाला आनंद मिळतो आणि नाती अधिक जवळ येतात.

हे पण वाचा – दिवाळी निबंध मराठी 10 ओळी

Maza Avadta San Diwali Marathi Madhe – माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठीत (संक्षिप्त निबंध)

भारत हा अनेक सण साजरे करणारा देश आहे. हिंदू सणांपैकी दिवाळी किंवा दीपावली हा हिंदूंसाठी सर्वात मोठा सण आहे. हा प्रकाशाचा सण आहे. आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा सन्मान करणारा हा सण आहे. हा शुभ दिवस संपूर्ण भारतात आनंदाने आणि दिव्यांनी साजरा केला जातो. हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो आणि हिंदू कॅलेंडरनुसार तो कार्तिक महिन्यात अमावस्येच्या दिवशी येतो.

दुष्ट रावणावर, १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परतल्यावर, भगवान रामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. हा सण वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे. रावणावर रामाचा विजय देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. दिवे लावणे आणि फटाके पेटवणे हे घरातील समृद्धीचे प्रतीक आहे. लोकसाहित्य परंपरेनुसार, भगवान रामाचे स्वतःच्या भूमीत स्वागत करण्यासाठी घरांमध्ये दिवे लावले गेले. या दिवसाच्या स्मरणार्थ, त्या दिवशी सर्व काही दिव्यांनी सजवले जाते. हे एक समृद्ध उत्सव स्वरूप देते.

दिवाळी हा माझा आवडता सण आहे कारण या दिवशी संपूर्ण भारत दिव्यांनी झाकलेला असतो आणि आपण फटाके पेटवून, मिठाई खाऊन आणि नवीन कपडे घालून खूप आनंद घेतो. दिवसाच्या एक आठवडा आधी उत्सव सुरू होतो आणि लोक मिठाई तयार करण्यास आणि उत्सवासाठी सजवण्यासाठी त्यांची घरे स्वच्छ करण्यास सुरवात करतात. या दिवशी देवीच्या स्वागतासाठी आपण आपल्या घरासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या काढतो. असे मानले जाते की देवी लक्ष्मी या दिवशी प्रत्येक घरात भाग्य, संपत्ती आणि समृद्धी आणते.

मला दिवाळी साजरी करायला आवडते कारण आम्ही फटाके खरेदी करतो आणि रात्री ते जाळतो आणि आमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत आनंद घेतो. आम्ही खूप गोड पदार्थ खातो आणि वाटप करतो आणि चविष्ट अन्न देतो आणि एकमेकांना भेटवस्तूंची देवाणघेवाण करतो. या दिवशी, आकाश पाहणे हे एक सौंदर्य आहे. फटाक्यांसोबत ते छान दिसेल. अशा प्रकारे, दिव्यांचा दिवस, दिवाळी हा माझा आवडता सण आहे कारण तो चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे.

हे पण वाचा – दिवाळी निबंध मराठी

माझा आवडता सण दिवाळी वर परिच्छेद – Paragraph on Diwali in Marathi

दिवाळी हा माझा आवडता सण आहे. हा दिव्यांचा सण आहे, तो आपल्या देशाच्या सर्व भागात साजरा केला जातो. दिवाळीच्या काही दिवस आधी लोक आपली घरे आणि दुकाने स्वच्छ करून घेतात. दिवाळीच्या दिवशी लोक आपली घरे सजवतात. दिवाळीच्या रात्री प्रत्येक गावात, शहरात दिवे लावले जातात. सर्व घरे, दुकाने आणि इमारती मातीचे दिवे, मेणबत्त्या आणि इलेक्ट्रिक बल्बने प्रकाशित होतात. मुले त्यांच्या चांगल्या कपड्यांमध्ये फिरतात. लोक मिठाई आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. मुले मिठाई, खेळणी आणि फटाके खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करतात. रात्री लोक धनाची देवी लक्ष्मीची पूजा करतात. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या दिवशी प्रत्येकजण आनंदी असतो.

My Favourite Festival Diwali Essay in Marathi – माझा आवडता सण दिवाळी निबंध इन मराठी

माझी आवडती सुट्टी म्हणजे दिवाळी किंवा दीपावली. त्याला “दिव्यांचा उत्सव” असेही म्हणतात. भारतातील हिंदू आणि भारतीय ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हा सण साजरा करतात. त्याची उत्पत्ती २,५०० वर्षांपूर्वी झाली.

या उत्सवाशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. रामायण, एक प्राचीन महाकाव्यानुसार, राम चौदा वर्षांच्या वनवासानंतर आपल्या राज्यात परत आला आणि दुष्ट राक्षस रावणाचा पराभव केला, ज्याने त्याची पत्नी सीतेचे अपहरण केले. त्यांचे राज्य अयोध्येला आल्यावर लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले. दक्षिण भारतातील एक लोकप्रिय कथा हिंदू देव कृष्णाविषयी आहे, ज्याने सोळा-हजार स्त्रियांना नरकासुर या दुष्ट राजापासून वाचवले होते. दोन्ही कथांमध्ये वाईटावर चांगल्याचा विजय आहे. दिवाळी हा देवी लक्ष्मीचाही उत्सव आहे.

दिवाळीच्या दिवशी मला मंदिरात जायला आवडते, जिथे मी लक्ष्मीची प्रार्थना करतो. आपण शांती, समृद्धी आणि संपत्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतो. मी नवीन भारतीय कपडे देखील घालतो, जसे की पुरुषांसाठी कुर्ता आणि महिलांसाठी साडी.

आम्ही आमच्या घरी मातीपासून बनवलेल्या दिवे तेलाने पेटवतो. तूप किंवा तेलात बुडवलेली कापसाची वात वापरून आम्ही त्यांना प्रकाश देतो. दिवाळीला “दिव्यांचा सण” असे संबोधण्याचे हे एक कारण आहे. हे वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधार दूर करण्याचे सूचित करते. आम्ही आमच्या मित्र आणि कुटुंबासह मिठाई देखील वाटून खातो.

दुधाच्या अनेक स्वादिष्ट मिठाई, काजू मिठाई आणि बदामाची मिठाई माझे कुटुंब तयार करते, परंतु या सर्व स्वादिष्ट मिठाईंपैकी गुलाब जामुन हे माझे आवडते आहे. हे साखरेच्या पाकात भिजवलेले खूप गोड असतात.

माझ्यासाठी दिवाळीचा माझा सर्वात आवडता भाग म्हणजे माझ्या कुटुंबासह रोषणाई करणे. चमचमीत प्रकाश आणि माझ्या कुटुंबाला “हॅपी दीपावली” म्हणणे मला दिवाळीचा खरा आत्मा शोधण्यात मदत करते, म्हणजे एकत्रता.

भारतात अनेक सण साजरे होतात, पण माझा आवडता दिवाळी आहे. दिवाळी आपल्याला नवीन सुरुवातीची आशा देते. दिवाळी आपल्या सर्वांना आनंद आणि आनंदाच्या भावनेने एकत्र आणते.

माझा आवडता सण दिवाळी मोठा निबंध – My Favourite Festival Diwali in Marathi

दिवाळी सण हा माझ्या आवडत्या सणांपैकी एक आहे. दरवर्षी मी दिवाळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहतो. दिवाळीचे ४-५ दिवस खूप आनंददायी आणि मनोरंजक असतात. हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो आणि हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे.

दिवाळीची तयारी

दिवाळी जवळ आली की घरे, दुकाने स्वच्छ करून रंगरंगोटी केली जाते. खोल्या पूर्णपणे स्वच्छ आणि सजवल्या जातात, कारण अशी जुनी समजूत आहे की या दिवशी देवी लक्ष्मी घरात येते आणि तिच्या आशीर्वादाचा वर्षाव करते. या दिवशी आपण सर्व मातीचे दिवे मोहरीच्या तेलाने लावतो. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. या दिवसात बाजारपेठा नवनवीन वस्तूंनी भरलेल्या असतात आणि या दिवसात बाजारपेठांमध्ये खूप गर्दी असते. लोक त्यांच्या आवडीच्या वस्तू विकत घेतात आणि तीच मुलं स्वतःसाठी फटाके आणि नवीन कपडे घेतात आणि मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात.

दिवाळीचा सण

धनत्रयोदशीचा सण दिवाळीच्या एक दिवस आधी येतो. धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारपेठांमध्ये गर्दी असते. लोक भांडी, सोने, चांदी आदींची खरेदी करतात. दिवाळीच्या दिवशी आपण आपल्या घराच्या दारात रांगोळी काढतो आणि फुलांच्या हारांनी घर सजवतो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात आणि संध्याकाळी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करतात. देवी लक्ष्मी आपल्या घरी यावी म्हणून घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवल्या जातात. नंतर, प्रसाद घेतल्यानंतर, आम्ही टेरेस आणि खोल्यांमध्ये दिवे लावतो. सर्वत्र दिवे लावल्यानंतर, आम्ही गच्चीवर जातो आणि फटाके फोडण्याचा आनंद घेतो.

मला हा सण खूप आवडतो कारण या उत्सवात एक साधेपणा आहे. जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र प्रार्थना करते तेव्हा मला ते आवडते. प्रसाद म्हणून लाडू खायला मिळतात. आजूबाजूला फक्त प्रकाश आहे जो अतिशय आकर्षक आहे.

दिवाळीनिमित्त माझ्या शाळेत रांगोळी स्पर्धा

दिवाळीच्या निमित्ताने रांगोळी काढण्याची प्रथा सर्रास सुरू आहे. दिवाळीच्या सुट्टीपूर्वी माझ्या शाळेत रांगोळी काढण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. रांगोळी काढण्याची आवड असलेले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात आणि रांगोळी काढून आपली कला प्रदर्शित करतात. रांगोळी स्पर्धा एकट्याने किंवा गटात आयोजित केली जाते. या स्पर्धेसाठी विद्यार्थी खूप उत्सुक असतात आणि विद्यार्थी फुले, रंग, तांदूळ, पीठ इत्यादींच्या मदतीने आपली कला दाखवतात. विद्यार्थी आपल्या कौशल्याने विविध प्रकारच्या रंगीबेरंगी रांगोळ्या काढतात. सर्वोत्तम रांगोळी काढणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस दिले जाते.

या सणाबद्दल आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो आणि आपल्यातील कलागुणांना बाहेर काढण्याची संधी मिळण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. या स्पर्धेनंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटपही करतो.

सण साजरे करण्यामागे धार्मिक श्रद्धा आहे

दिवाळीचा सण साजरा करण्यामागे अनेक धार्मिक कथा आहेत. भारत हा विविध सांस्कृतिक आणि धार्मिक श्रद्धांचा देश आहे, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करण्यामागे अनेक धार्मिक श्रद्धा आहेत. या सर्व विश्वासांपैकी सर्वात लोकप्रिय श्रद्धा म्हणजे भगवान श्री राम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले. वनवासात रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेत नेले आणि भगवान रामाने रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले आणि त्याच दिवशी अयोध्येला परतले. राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतल्याच्या स्मरणार्थ लोक या दिवशी मोठ्या आनंदाने अयोध्याला सजवतात. अयोध्या नगरीत लोकांनी अत्यंत उदार मनाने रामाचे स्वागत केले होते.

जर आपण या सणाच्या सर्व समजुतींवर नजर टाकली तर आपण असे म्हणू शकतो की हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. दिव्यांचा सण हा आनंदाचा आणि अंधार आणि वाईटावर विजय मिळवण्याचा सण आहे. सदैव सत्य आणि चांगुलपणाचा मार्ग अवलंबला पाहिजे असा संदेशही हा सण देतो.

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यावर भर

आपण दरवर्षी दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. या दिवशी अनेकजण फटाकेही पेटवतात. फटाक्यांमधून भरपूर धूर निघतो, त्यामुळे आपले वातावरण खूप प्रदूषित होते. फटाक्यांच्या धुरात अनेक हानिकारक पदार्थ असतात. यामुळे आपला एअर क्वालिटी इंडेक्स (AIQ) खालावतो, ज्यामुळे आपल्या आरोग्याला खूप नुकसान होते. फटाक्यांच्या या धुरामुळे आपले वातावरणही अत्यंत विषारी बनते, त्यामुळे पशु-पक्ष्यांचे खूप नुकसान होते. फटाक्यांमुळे होणाऱ्या आवाजाचा आपल्या मुलांवर, वृद्धांवर आणि प्राण्यांवर खोलवर परिणाम होतो.

दिवाळीच्या या सणावर सर्व दुकाने, घरे, मंदिरे आणि आजूबाजूची सर्व ठिकाणे दिव्यांनी उजळून निघतात, ज्यामुळे खूप सुंदर दृश्य दिसते. देश-विदेशातील सर्व धर्माचे लोक हिंदूंचा हा प्रमुख सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनही हा सण साजरा केला जातो.

  • दिवाळी सणाची माहिती मराठीत
  • दिवाळी निबंध मराठी
  • दिवाळी निबंध मराठी 10 ओळी
  • माझे आजोबा निबंध मराठी
  • माझी आजी निबंध मराठी 
  • माझे बाबा निबंध मराठी
  • मी पाहिलेला अपघात निबंध
  • माझी शाळा मराठी निबंध
  • माझा आवडता खेळ निबंध
  • माझा जिवलग मित्र मराठी निबंध 
  • माझे कुटुंब निबंध मराठी
  • शिक्षक दिन निबंध मराठी 
  • माझी शाळा निबंध मराठी लेखन
  • माझी आई निबंध मराठी
  • माझी शाळा निबंध 10 ओळी  

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi

Essay On Diwali in Marathi: प्राचीन काळापासून सणांची भव्य परंपरा भारतात चालत येत आहे. घराचा दिवा पेटविणारी दीपावली किंवा दिवाळी खरोखरच भारतीय उत्सवांची राणी आहे. लोक वर्षभर तिची प्रतीक्षा करत असतात.

दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali in Marathi

संबंधित पौराणिक कथा.

काही लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा श्री रामचंद्रजी लंका आणि विजयानंतर अयोध्येत परत आले, तेव्हा अयोध्यातील रहिवाशांनी हा उत्सव दिवे प्रज्वलित करुन साजरा केला. तेव्हापासून हा सण लोकप्रिय झाला आहे. असे मानले जाते की महाराज युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाची समाप्ती या दिवशी झाली, तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो. काही लोक दीपावलीला भगवान महावीरांचा निर्वाण दिवस मानतात. अशाप्रकारे, प्रत्येक भारतीय दीपावलीच्या उत्सवात जवळीक पाहतो.

दीपावली स्वच्छता व सजावटीचा सुवर्ण संदेश आपलया घरी घेऊन येते. तिच्या आगमनाच्या काही दिवस अगोदर, लोक आपली घरे स्वच्छ करण्यास प्रारंभ करतात. ते त्यांच्या घरातून वर्षभरातली घाण काढतात. ते नवीन कपडे शिवतात आणि दागदागिने खरेदी करतात. मिठाई आणि चविष्ट जेवण घरोघरी बनवले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे फटाके मुलांना आकर्षित करतात. खरं म्हणजे दिवाळी येण्यापूर्वी सर्वत्र आनंदाची लाट उसळते.

दीपावलीचे वर्णन

अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील त्रयोदशी (धनतेरस) पासून कार्तिक महिन्याच्या शुक्लपक्षातील द्वितीया (भैयदुज) पर्यंत दीपावली धूमधामपणे साजरी करतात. घरोघरी असंख्य दिवे, मेणबत्त्या आणि इलेक्ट्रिक बल्ब पेटवले जातात. फटाके आणि अतिशबाजीने वातावरण दरवळून जाते. धनतेरसच्या दिवशी लोक संपत्तीची पूजा करतात. त्यानंतर छोटी दीपावली येते, ज्याला नरक चतुर्दशी देखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूने नरकासुराचा वध केला. दिवाळी म्हणजे अमावसचा दिवस व्यवसायातील लोक लेखाच्या नवीन पुस्तकांची पूजा करतात. दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी नवीन वर्ष सुरू होते. या दिवशी, लोक आनंदाने आपल्या प्रियजनांमध्ये मिसळतात आणि नवीन वर्षासाठी एकमेकांच्या शुभेच्छा व्यक्त करतात. मग, भाउबीजीच्या दिवशी बहीण भवाची आरती ओवाळून त्याला प्रेमाचा टिळा लावते आणि भाऊ मग बहिणीला ‘ओवाळणी’ देऊन तिचा सत्कार करतो.

दोष दूर करणे

दीपावली दरम्यान काही लोक जुगार खेळत दारू पितात, याद्वारे बऱ्याच लोकांचा नाश होतो. दीपावलीत फटाके खूप असल्यामुळे वायू प्रदूषण होते, बरेच लोक जळतात आणि कधीकधी भयानक जाळपोळ होते. या वाईट गोष्टी टाळल्या पाहिजेत.

आमचे अंगण आणि हृदय दोघेही दीपावलीच्या प्रकाशात उजळतात. आमच्या मत्सर आणि वैरभावनेच्या भावना प्रेम, सदभावना आणि मैत्रीत बदलतात, सामाजिक जीवनास एक नवीन प्रकाश मिळतो आणि नवीन वर्ष त्याच्या कर्तव्याची पूर्तता करण्यासाठी सामर्थ्य प्राप्त करते. खरंच, दीपावलीचा प्रत्येक दिवा म्हणजे एखाद्या महान माणसाचा आत्मा.

आनंद आणि प्रकाशाची देवी, हे दीपमालके ! तुझं नेहमीच स्वागत आहे.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध
  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी
  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…
  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Creator Marathi

Best Place for Marathi Content

दिवाळी मराठी निबंध – Diwali essay in marathi

Diwali essay in marathi

Diwali essay in marathi :- आजच्या लेखामध्ये आपण भारतीय सण दिवाळी बद्दल मराठी निबंध (Diwali essay in marathi) पाहणार आहोत. दिवाळी हा भारतातील एक अत्यंत लोकप्रिय सण आहे. हा सण भारतात धुमधड्याकात साजरा केला जातो. आज आपण ह्याविषयी एक मराठी निबंध पाहणार आहोत. तसेच हा निबंध तुम्ही तुमच्या उपयोगासाठी नक्की वापरू शकता.

Diwali essay in marathi :- दिवाळी , सर्व सणांची राणी, हा एक उत्सव आहे जो सर्वोच्च राज्य करतो. सहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर, या भव्य सोहळ्याचे आगमन मोठ्या अपेक्षेने केले जाते. दिवाळीच्या पंधरा ते वीस दिवस अगोदर “आली दिवाळी, आली दिवाळी” च्या गजराने सगळीकडे जल्लोष निर्माण होतो.

हा आनंदाचा, एकत्रपणाचा आणि समृद्धीचा काळ आहे आणि सणांमध्ये सामील होण्यापेक्षा त्याचा अनुभव घेण्याचा दुसरा चांगला मार्ग नाही. चला तर मग, दिवाळीचे चैतन्य स्वीकारून त्याच्या वैभवाचा आनंद घेऊ या!

  • संपूर्ण मराठी आरती संग्रह | Aarti Sangrah in Marathi

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणार्‍या दसऱ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आमच्यात सामील व्हा. आगामी दिवाळी सणांच्या तयारीसाठी ही योग्य वेळ आहे आणि प्रत्येक घरामध्ये उत्साह संचारला आहे. आमची मुले विशेषतः रोमांचित आहेत आणि त्यांच्या आनंदाला सीमा नाही.

अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला, माता त्यांच्या पुढच्या अंगणांना उत्साही गेरूने सजवतात आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आकर्षक रांगोळ्या काढतात. आणि पाहुण्यांबद्दल बोलतांना, आम्ही तुम्हाला हा शुभ सोहळा साजरा करण्यासाठी आमच्यात सामील होण्यासाठी हार्दिक आमंत्रण देतो.

आपण एकत्र या आणि दसऱ्याच्या आनंदात आणि आशीर्वादाचा आनंद घेऊ या. आम्ही तुम्हाला प्रेम, हशा आणि आनंदाने भरलेला अविस्मरणीय अनुभव देतो. त्यामुळे तुमची कॅलेंडर चिन्हांकित करा आणि आमच्यासोबत साजरी करण्यासाठी सज्ज व्हा!

वसुबारसची पवित्र परंपरा साजरी करण्यात आम्हाला सामील व्हा, जिथे आम्ही द्वादशीला गाय आणि वासराची पूजा करतो. आणि दिवाळीच्या मुख्य दिवशी, नरकचतुर्दशी, आपण भगवान कृष्णाच्या वीर कृत्याचे स्मरण करतो कारण त्याने नरकासुराचा पराभव केला.

  • 50+ Save Water Slogans in Marathi“पाणी वाचवा घोषवाक्ये”

आणि असंख्य स्त्री-पुरुषांना कैदेतून मुक्त केले. महान सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या या महत्त्वपूर्ण घटनांना आपण एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण करू या.

लक्ष्मी पूजनाचे महत्त्व विशेषत: व्यापाऱ्यांसाठी जास्त सांगता येणार नाही. बलिप्रतिपदा हा दान आणि त्यागाच्या भावनेचे स्मरण करणारा दिवस आहे. आणि भाऊबीज, बंधुप्रेमाचे बंधन साजरे करणारा दिवस विसरू नका.

या दिवाळीत , आपल्यातील मतभेदांची पर्वा न करता सर्वांवर प्रेम करण्याच्या महत्त्वाची आठवण करून दिली जाते. प्रत्येकजण लाडू, करंज्या आणि चकल्या यांसारख्या स्वादिष्ट मिठाईत. तसेच रात्रीचे आकाश रंगीबेरंगी फटाक्यांनी उजळून टाकत या सणाचा आनंद लुटता येतो.

  • दिवाळी सणाची माहिती, तथ्य, महत्व!

आणि नवीन कपडे घालणे आणि प्रियजनांसोबत मनापासून शुभेच्छांची देवाणघेवाण करणे कोणाला आवडत नाही? शाळांनाही सुट्ट्या असतात, त्यामुळे या सणासुदीच्या आनंदात भर पडते. या आनंदी दिवाळीची आपण जपणूक करूया आणि ती चिरकाल टिकू दे.

आजच्या लेखामध्ये आपण भारतीय सण दिवाळी बद्दल मराठी निबंध (Diwali essay in marathi) आपल्या मराठी भाषेत जाणून घेतला आहे. तुम्हाला ह्या माहितीचा उपयोग होईल, अशी मी आशा करतो. तसेच हा दिवाळी मराठी निबंध तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

  • तंत्रज्ञान: शाप की वरदान? | Marathi Essay
  • १० गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या जीवनात पाळल्या पाहिजेत

Related Posts

diwali essay in marathi easy

Marathi Suvichar | 500+ मराठी सुविचार – marathi suvichar images

diwali essay in marathi easy

Marathi Ukhane For Bride | 100+ नवरीसाठी मराठी उखाणे | Marathi Bride Ukhane

Leave a reply cancel reply.

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

  • Privacy Policy

10000+ Birthday Wishes in Marathi | मराठी शुभेच्छा संग्रह

Header Ads Widget

10000+ Birthday Wishes in Marathi | मराठी शुभेच्छा संग्रह

  • Anniversary
  • Birthday Wishes
  • Festival Wishes
  • _Day's Wishes
  • _Regional Festival

Diwali essay in Marathi | दिवाळी निबंध मराठी

Diwali essay in marathi | दिवाळी निबंध मराठी .

Diwali essay in Marathi | दिवाळी निबंध मराठी

💥 दिवाळी: दिव्यांचा सण 💥

💥 ऐतिहासिक महत्व: 💥, 💥 सांस्कृतिक महोत्सव: 💥, 💥 धार्मिक निरीक्षणे: 💥, 💥 परंपरा आणि चालीरीती: 💥, 💥 आधुनिक आव्हाने आणि बदल: 💥, 💥 दिवाळी आणि कौटुंबिक नातं: 💥, 💥 जगभरात दिवाळी: 💥, 💥 दिवाळीचा आर्थिक परिणाम: 💥, 💥 दिवाळी आणि कलात्मक अभिव्यक्ती: 💥, 💥 प्रकाशाचे प्रतीक: 💥, 💥 दिवाळी आणि देण्याची भावना: 💥, 💥 नव्या सुरुवातीचा सण: 💥, 💥 दिवाळी आणि सर्व धर्म एकोपा: 💥, 💥 निष्कर्ष: 💥.

Admin

Posted by: Admin

You may like these posts, post a comment.

  • Anniversary 2
  • Biography 1
  • Birthday Wishes 3

Social Plugin

Popular posts.

Anniversary Wishes for Husband in Marathi | नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Anniversary Wishes for Husband in Marathi | नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Mahatma Gandhi Essay | Mahatma Gandhi Nibandh - महात्मा गांधी

Mahatma Gandhi Essay | Mahatma Gandhi Nibandh - महात्मा गांधी

Anniversary wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Anniversary wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Menu footer widget.

IMAGES

  1. माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध

    diwali essay in marathi easy

  2. माझा आवडता सण दिवाळी १० ओळी मराठी निबंध

    diwali essay in marathi easy

  3. Diwali nibandh in Marathi, short essay on Diwali in Marathi by Smile please world

    diwali essay in marathi easy

  4. माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध

    diwali essay in marathi easy

  5. दिवाळी निबंध

    diwali essay in marathi easy

  6. diwali wishes in marathi

    diwali essay in marathi easy

VIDEO

  1. Diwali

  2. Essay on Diwali in Marathi

  3. दिवाळी निबंध मराठीत || Diwali Marathi Nibandh || Essay On Diwali in Marathi || दीपावली निबंध मराठी

  4. दिवाळी माहिती निबंध भाषण ।माझा आवडता सण दिवाळी । Diwali essay on Diwali l Marathi essay on Diwali

  5. दिवाळी 5 ओळींचा सोपा निबंध

  6. शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी/shalecha pahila divas nibandh marathi

COMMENTS

  1. Diwali Essay in Marathi (10 lines / 200 शब्द / 500 शब्द) दिवाळी निबंध

    Diwali Festival Essay in Marathi - (10 lines) दिवाळी वर मराठी निबंध. 10 Lines on Diwali Festival Essay in Marathi. दिवाळी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, ज्याला "दीपावली" असेही म्हणतात.

  2. माझा आवडता सण दिवाळी निबंध Diwali Essay In Marathi

    diwali essay in marathi भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी.

  3. दिवाळी निबंध मराठी

    30 September 2023by Rajesh. Diwali Essay in Marathi: दिवाळी हा सण पाच दिवस चालणारा सर्वात मोठा सण आहे. दसऱ्यानंतर घराघरांत दिवाळीची तयारी सुरू होते, जी मोठ्या ...

  4. दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi

    दिवाळी वर १० ओळीत मराठी निबंध 10 Line On Diwali In Marathi. १) दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. २) दिवाळी हा भारतात साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव आहे. ३ ...

  5. Essay On Diwali

    Essay On Diwali : A "festival of lights," Diwali (also known as Divali or Deepavali) honours the blessings of victory, freedom, enlightenment, and the triumph of light over darkness and good over evil. The word "row of lights" (Sanksrit Deepavali) is where the name originates.

  6. दिवाळी वर मराठी निबंध

    माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi :- दिवाळी हा संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. विशेष बाब म्हणजे हा सण

  7. दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

    जर तुम्ही दिवाळी निबंध मराठीमध्ये । Diwali Essay in Marathi । Essay on Diwali in Marathi शोधत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये आपण दिवाळी निबंध ...

  8. diwali essay in marathi

    चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. diwali-nibandh-in-marathi. निबंध 1 (350 शब्‍दात) भारत हा सण व उत्‍सवांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण व उत्‍सवांच्‍या ...

  9. (Top 5) दिवाळी निबंध मराठी

    आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 4 उत्तम Diwali Essay in Marathi - दिवाळी निबंध मराठी शेअर करीत आहोत.या लेखात देण्यात आलेले दिवाळी चे निबंध 100

  10. Diwali Essay in Marathi : जगमगत्या दिव्यांचा सण दिवाळी निबंध

    या सणामध्ये वसु-बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी-पूजन, पाडवा आणि भाऊबीज हे महत्त्वाचे दिवस असतात. - Diwali Essay in Marathi Diwali Essay, the world's festival of lights

  11. दिवाळी वर मराठी निबंध, Essay on Diwali in Marathi

    दिवाळी वर मराठी निबंध, Essay on Diwali in Marathi भारत हा सणांचा देश मानला जातो. या सर्व सणांमध्ये होली, दिवाळी, दसरा, नवरात्री हे प्रमुख सण आहेत.

  12. How To Write Diwali Essay In Marathi: 'दिवाळी' सणावर निबंध लिहायचाय; हा

    Diwali Festival Essay: सध्या सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी पडली असून, बच्चेकंपनी दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. मात्र, या सुट्टीतही घरच्या अभ्यासाने ...

  13. Essay on Diwali in Marathi 2024.

    सोपा दिवाळी वर मराठी निबंध / Essay on Diwali in Marathi. दिवाळी जवळ येताच लोकांच्या आनंदाला हर्षाला सीमा राहत नाही, नवी दोन चाकी, नवी चार चाकी गाडी ...

  14. diwali essay in marathi 10 lines!! दिवाळी निबंधात या साध्या सोप्या ओळी!!

    शाळेतील मुलांसाठी 10 ओळी निबंध (diwali essay in marathi 10 lines) !माझ्या तर्फे दिवाळीच्या सर्वांना भरभरून हार्दिक शुभेच्छा! दिवाळी 2022हा एक दिव्यांचा सण ...

  15. दिवाळी निबंध मराठी

    Diwali Essay in Marathi, दिवाळी निबंध मराठी, सर्व प्रथम, हे समजून घ्या की भारत हा सणांची भूमी आहे. तथापि, कोणताही सण दिवाळीच्या जवळ येत नाही. हा नक्कीच भारतातील सर्वात ...

  16. दिवाळी निबंध मराठी 10 ओळी 2023

    माझा आवडता सण दिवाळी १० ओळी मराठी निबंध | Maza Avadta San Diwali nibandh marathi 10 lines. 1.दिवाळी हा भारतातील अत्यंत लोकप्रिय सण आहे. माझा आवडता सण हा दिवाळी आहे. 2 ...

  17. माझा आवडता सण दिवाळी वर निबंध

    माझा आवडता सण दिवाळी लहान निबंध - Short Essay on My Favourite Festival Diwali in Marathi ; Maza Avadta San Diwali Yavar Nibandh - माझा आवडता सण दिवाळी या विषयावर निबंध मराठी (लहान निबंध)

  18. दिवाळी निबंध in मराठी

    Tags: Diwali Essay : दिवाळी सणावर निबंध लिहायचा आहे दिवाळी निबंध 10 ओळी दिवाळी सणाची माहिती माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी

  19. दिवाळी निबंध Diwali Essay

    दिवाळी निबंध Diwali Essay. दिवाळी हा हिंदू लोकांचा मोठा आवडीचा आणि महत्त्वाचा सण आहे. तसे तर आपल्या हिंदू धर्मात बरेच सण साजरे केले जातात ...

  20. दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi

    Essay On Diwali in Marathi: प्राचीन काळापासून सणांची भव्य परंपरा भारतात चालत येत आहे. घराचा दिवा पेटविणारी दीपावली किंवा दिवाळी खरोखरच भारतीय उत्सवांची राणी आहे.

  21. दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi

    विद्यार्थी खाली दिलेल्या दिवाळी सणावरील निबंध ( Essay of Diwali Festival In Marathi ) तपासू शकतात आणि दिवाळी सणाबद्दल त्यांचे वैयक्तिक अनुभव व्यक्त करण्यासाठी किंवा शेअर ...

  22. दिवाळी मराठी निबंध

    Diwali essay in marathi:- आजच्या लेखामध्ये आपण भारतीय सण दिवाळी बद्दल मराठी निबंध (Diwali essay in marathi) पाहणार आहोत. दिवाळी हा भारतातील एक अत्यंत लोकप्रिय सण आहे.

  23. Diwali essay in Marathi

    Diwali essay in Marathi, नमस्कार मित्रांनो 🙏 आपण आज ह्या लेखामध्ये Diwali Essay in Marathi म्हणजेच दिवाळी निबंध मराठी याबाबत चर्चा करणार आहोत.