- असे झाले तर
- वर्नात्मक
- मनोगत
- प्राणी
- अनुभव
हिवाळा मराठी निबंध | Short Essay on Winter in Marathi.
नमस्कार मित्रांनो हिवाळा कोणाला आवडत नाही असे नाही, हा ऋतू सगळ्यांनाच आवडतो आणि आता तर हिवाळा ह्या ऋतूला सुरवात होईल. ह्याच निमित्ताने मराठी निबंध आपल्या साठी हिवाळा ह्या ऋतू वर एक मराठी निबंध घेऊन आला आहे.
तर चला मित्रांनो हिवाळा ह्या निबंधाला सुरवात करूया.
हिवाळा | माझा आवडता ऋतू हिवाळा.
हिवाळा ह्या ऋतूला शीत ऋतू हि म्हटले जाते. हिवाळ्याची सुरवात डिसेंबरच्या महिन्यात होते आणि हा ऋतू सलग चार महिने म्हणजेच मार्च महिन्यात होळी पर्यंत असतो. हिवाळा हा एक आनंद देणारा ऋतू आहे असे म्हणने काही चुकीचे ठरणार नाही.
हिवाळ्या मदे सूर्याची तीव्र गर्मी नसते, तर संपूर्ण वातावरणा मदे गारवा असतो. ह्या ऋतू मदे लोकांची घामा पासून सुटका होते. हिवाळ्या मदे काम करयला फारसा कंटाळा येत नाही आणि काम करून पण खूप थकवा लागत नाही.
हिवाळा सुरु झाला आणि जशी थंडी चे प्रमाण वाडू लागते तसे-तसे सकाळी उठू नये आणि थोडा वेळ अजून झोपावे असेच वाटते, पण काय करणार शाळेत जायला उठायलाच लागते.
मि आणि माझ्या गावातील सर्व मित्र रविवारी एकत्र सकाळी लवकर उठून हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात चालायला निगतो. सकाळ-सकाळ चलायला खूप मज्या येते कारण वातावरण मस्त थंड असते सर्वी कडे धुके असतात, कधी-कधी इतकी धुके असतात कि समोरच काही दिसत नाही पण अश्या वातावरणात चालत अस्ताना असे वाटते कि आपण ढगान मदे चालत आहोतो, अश्या वातावरणात जाण्याची मज्या काही वेगळीच असते.
सूर्य उगवला तरी फारशी गर्मी पडत नाही उलट वातावरण मस्त थंड असते आणि अश्या वातावरणा मदे फिरायला कंटाळ येत नाही. हिवाळ्या मदे वातावरणा मदे देखील खूप बदल होतात. झाडांची पाने गळू लागतात आणि झाडांना नवीन पाने येऊ लागतात, झाडांच्या भवती पडलेली पाने खूप सुंदर दिसतात. झाडांनवर फुले येऊ लागतात आणि निसर्ग खूपच सुंदर दिसू लागते, जसे काही सगळी कडे सुंदर बागा बनवल्या आहेत.
थंडी असल्या मुळे आम्ही शाळेत श्वेटर घालून जातो आणि धंडी मदे शाळेत एक वेगळीच मज्या असते शाळे मदे सर्व मुले धंडी मदे तोंडांनी थंडीच्या वाफा काढत बसतात असे करयला खूप मज्या येते. घरी रात्री झोपताना दोन तीन चादर अंगावर घेऊन झोपण्याचा मज्या पण वेगळीच असते.
हिवाळ्या मदे धंडी जास्त वाढते तेव्हा मी आणि माझ्या गावातील मित्र राती जेवल्या नंतर बाहेर नाईट क्रिकेट खेळतो आणि मज्या करतो कधी-कधी आम्ही झाडांची लाकडे जमा करतो आणि एक छोटी शेकोटी पेटवतो आणि त्या आगीला गोल करून सगळी मुले बसतात आणि गाणी म्हणतात गप्पा गोष्टी करतात.
असा हा हिवाळ्याचा ऋतू खूपच आनंदाने जातो आम्ही हिवाळ्या मदे खूप मज्या करतो. ह्या ऋतू मदे वातवरण एकदम रम्य असते म्हणूनच हिवाळा हा ऋतू मला खूप-खूप आवडतो.
तर मित्रांनो तुम्ही हिवाळ्या मदे काय करता? आणि तुमच्या कडे किती थंडी पडते आम्हाला नक्की खाली comment करून सांगा.
हिवाळा हा मरठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.
तसेच हिवाळा हा मराठी निबंध खालील दिलेल्या विषयांवर पण वापरला जाऊ शकतो.
- माझा आवडता ऋतू – हिवाळा मरठी निबंध.
- हिवाळा माझा आवडता ऋतू.
- हिवाळया मदे वातावरणा मदे होणारे बदल.
- हिवाळा मला का आवडतो मराठी निबंध.
तर मित्रांनो हिवाळा हा मरठी निबंध आपल्यांना कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करून सांगा.
धन्यवाद
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
टिप्पणी पोस्ट करा, 16 टिप्पण्या.
cagla hota😊😊😊
Welcome we happy we helped you :)
निबंध खुप छान आहे
धन्यावद आम्हाला आनंद आहे तुम्हाला हा निबंध आवडला. :)
this help me in my homework
Your essay is really helpful Thank you so much :)
We are happy that our essay was so helpful to you :)
It's very good essay It helpful essay for my next day speech
Welcome we are happy that this essay help you :)
Featured Post
सायकल वर मराठी निबंध.
नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …
Popular Posts
Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध
माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.
माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.
[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi
- अनुभव 12
- असे झाले तर 9
- आवडता ऋतू 1
- आवडता खेळ 1
- आवडता पक्षी 1
- आवडता प्राणी 2
- आवडता सण 5
- आवडते फुल 2
- ऋतू 2
- काल्पनिक 9
- चरित्रात्मक 3
- प्रधुषण 1
- मनोगत 4
- माझ गाव 1
- माझा देश 1
- माझी आई 3
- माझी शाळा 3
- माझे घर 1
- माझे बाबा 1
- म्हण 6
- वर्नात्मक 16
- व्यक्ती 2
- समस्या 1
- Educational Essay 20
- Important Day' 1
Menu Footer Widget
- Privacy Policy
- Terms and Conditions
माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध | Winter Essay In Marathi
Set 1: माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध – winter essay in marathi.
Table of Contents
हिवाळा हा सर्वात आनंददायक ऋतू. या काळात छान थंडी असते. अंगाला धाम येत नाही. कंटाळा येत नाही. छान छान स्वेटर घालायला मिळते.
हिवाळ्यातील सकाळ सुखद व छान असते. अंथरुणात लोळत राहावे, असे वाटते. बाहेर फिरायलाही मजा येते. खूप थंडी असते, तेव्हा बोलताना तोंडातून वाफ येते. त्याची खूप गंमत वाटते. अनेकदा खूप धुके असते. मग जवळचेही दिसत नाही. हिवाळ्यात झाडांखाली पानांचा सडा पडतो. काही झाडांना फुलेही येतात.
हिवाळ्यात अनेक ठिकाणी जत्रा भरते. शाळेतल्या क्रीडास्पर्धा, सहली व स्नेहसंमेलने याच काळात होतात. आईबाबाही सहलीला नेतात. असा हा ऋतू आनंददायक आहे. तो मला खूप आवडतो.
Set 2: थंडीतील सकाळ मराठी निबंध – Maza Avadta Rutu Hivala Marathi Nibandh
उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीन ऋतूंमध्ये मला हिवाळा हा ऋतू खूप आवडतो. या ऋतूत उन्हाळ्यातील दाहकता व घामाचा चिकचिकाट नसतो; पावसाळ्यातील चिखल नसतो. सर्वत्र प्रसन्न वातावरण असते. हिवाळ्यातील सका सुखद असते.
आमच्या गावाकडील हिवाळ्यातील सकाळ मला खूप आवडते. सर्वत्र धुकेच धुके पसरलेले असते. दूरवर डोंगराचे फक्त सुळके दिसतात, अधूनमधून झाडांचे शेंडे दिसतात. देवळाचा कळसच तेवढा चमकत असतो. सर्वत्र पानांचा सडा पडलेला असतो. पानांवर, गवतावर सर्वत्र दव पडलेले असते. अशा वेळी रानातून हिंडताना खूप खूप . मजा येते.
काहीजण शाल पांघरून फेरफटका मारतात. मुले रंगीबेरंगी स्वेटर घालून मजेत शाळेत जात असतात. मला कधी कधी जाडजूड पांघरूण घेऊन अंथरुणात लोळत राहावे, असे वाटते.
अशी ही थंडीतील प्रसन्न सकाळ वर्षभर हवी!
Set 3: हिवाळ्यातील एक दिवस मराठी निबंध – Hivalyatil Ek Divas Nibandh in Marathi
हिवाळा हा शब्दच मला फार आवडतो. कारण आमच्या मुंबईत सहसा आम्हाला हिवाळा असा काही प्रकार फारसा अनुभवायलाच मिळत नाही.
माझी आई सांगते की पूर्वी दिवाळीच्या सुमारास थंडी पडत असे. परंतु आता मात्र डिसेंबरमध्ये ख्रिसमस येतो तेव्हा कुठे जेमतेम थंडी पडल्यासारखी वाटते. ती थंडी फेब्रुवारीपर्यंत थोडीशी टिकते. मात्र एकदा का मार्च महिना सुरू झाला की मात्र उन्हाची जोरदार रणरण सुरू होते.
ह्या वेळेस जानेवारी महिन्यात मुंबईत काही दिवस चांगलीच थंडी पडली होती. हिमालयातील थंड वा-यांनी दिशा बदलली त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली होती, त्याचा थोडासा परिणाम म्हणून आमच्या मुंबईतही गारठाआला होता.
मला चांगले आठवते आहे की त्या हिवाळ्याच्या दिवशी मी शाळेत जायला सकाळी लौकर उठलो तर माझे दात थंडीने कडकड वाजू लागले होते. मग आईने मला अगदी कढत पाणी आंघोळीला दिले तेव्हा कुठे जरासे बरे वाटले. तिने स्वेटरही पेटीतून काढून ठेवला होता. कधी नव्हे तो मी स्वेटर घालून शाळेत गेलो तेव्हा बाहेर सात वाजून गेले तरी अंधारल्यासारखे वाटत होते. सर्वत्र गारठा होता. किंचितसे धुकेही जाणवत होते.
परंतु जरा वेळाने सूर्य आकाशात आला आणि धुके कुठल्याकुठे पळून गेले. हवा उबदार झाली तशीच ती सुखदही झाली. त्या उत्फुल्ल हवेत मला तर खेळायला जावेसेच वाटू लागले. सुदैवाने आमच्या शाळेत त्या दिवशी क्रिडास्पर्धा होत्या. त्यामुळे अभ्यास काही नव्हताच. तो सुंदर दिवस आम्ही मुलांनी शाळेच्या मैदानावरच घालवला. मी खोखोच्या संघात होतो. त्यामुळे तर मी प्रत्यक्ष खेळातच होतो. थंड हवेत खेळताना अजिबात दमल्यासारखे वाटत नव्हते.
वर्गातील इतर मुलेही आम्हाला टाळ्या वाजवून उत्तेजन देत होती. त्यामुळे हिवाळ्यातला तो दिवस एवढा सुंदर गेला म्हणून सांगू? मला वाटते की क्रीडास्पर्धा आणि वार्षिकोत्सव म्हणूनच हिवाळ्यात ठेवत असावेत. त्या हवेमुळे खरोखरच दमछाक कमी होते. देवा, आमच्या मुंबईला तू नेहमीच अशी हवा दिलीस तर किती छान होईल?
Set 4: माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध
आमच्या मुंबईत फार हिवाळा पडतच नाही. त्यातच हल्ली वातावरणात बदल झाला आहे, त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीत थोडीशी हवा चांगली असते. परंतु मी पुण्याला मामाकडे किंवा नाशिकला मावशीकडे डिसेंबरच्या सुट्टीत जातो. तिथे मात्र पहाटे आणि संध्याकाळी चांगली थंडी असते. तेव्हा मला माझ्या आईने माझ्यासाठी विणलेला स्वेटर घालता येतो.
आपल्या देशात काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि पंजाबचे काही भाग ह्या ठिकाणी हिवाळ्यात भरपूर थंडी पडते. काश्मीरमध्ये तर बर्फच पडतो. हिवाळ्यात झाडांची पानेही गळून पडतात. सैबरियासारख्या उत्तर ध्रुवाजवळील भागात तेव्हा एवढी थंडी असते की सजीव प्राण्यांना राहाणे अवघड व्हावे. त्यामुळे त्या भागातील अनेक पक्षी आपल्या भारतात स्थलांतर करून आलेले आपल्याला दिसतात ते ह्या हिवाळ्यातच बरे का ! कारण आपल्याकडचा उन्हाळा त्यांना नक्कीच सोसतो.
आपला मकर संक्रांत हा सण हिवाळ्यातच येतो. त्या वेळेस तीळगूळ आणि गुळाच्या पोळ्या बनवण्याची प्रथा आहे कारण गूळ आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ आहेत आणि त्यांच्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.
हिवाळ्यात लोकांना थंडी वाजते म्हणून ते गरम कपडे विकत घेतात. त्यामुळेच आपल्याला मुंबई आणि पुणे येथे गरम कपड्यांची गाठोडीघेऊन विकायला आलेले तिबेटी लोक दिसतात.
दिवाळी, नाताळ आणि संक्रांत हे सणही हिवाळ्यातच येतात. तसेच हिवाळ्याच्या काळात मुंबईची हवा नेहमीपेक्षा बरीच चांगली असते म्हणून मला हिवाळा हा काळ खूप आवडतो.
Set 5: माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध
पावसाळ्यानंतर येणारा ऋतू म्हणजे हिवाळा होय. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे चार महिने हिवाळ्याचे असले तरी कडक थंडी डिसेंबर महिन्यातच असते. थंडीची चाहूल लागताच लोक ऊबदार कपडे वापरायला सुरुवात करतात.
खेड्यात हिवाळ्याचे स्वागत शेकोटीने होते. सकाळी आणि संध्याकाळी लोक शेकोटी करतात. शेकोटीवर शेतीतल्या, राजकारणातल्या गप्पा रंगतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत लोक शेकोटीत सामील होतात आणि थंडीपासून आपला बचाव करतात.
हिवाळा ऋतू माझ्या आवडीचा आहे. असे कोणी म्हणत नसले तरी हिवाळ्यात आपल्याला खूप भूक लागते. खाल्लेले सारे काही पचते. लोक आहारात मांस, अंडी, लोणी, भाज्या यांचा वापर मोठ्या प्रमाणात करून थंडीविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करतात. आपली प्रकृती सुधारण्यासाठी, व्यायामासाठी आणि अभ्यासासाठी हा ऋतू उत्तम आहे असे डॉक्टर नेहमीच सांगतात.
हिवाळा ऋतू आरोग्यदायी आहे, असे सगळेच सांगत असले तरी सकाळी लवकर उठून शाळेला जायचे म्हणजे नकोसे वाटते. त्यातच पहिल्याच तासाला काहीतरी लेखन करायचे म्हणजे त्याहून कठीण. अशावेळी सकाळच्या कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत एखादी कविता शिकायला किंवा नवीन धडा शिकायला खूप मौज वाटते.
- माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी
- माझा आवडता अभिनेता निबंध मराठी
- माकडांची शाळा निबंध मराठी
- महाराष्ट्रातील अभयारण्ये मराठी निबंध
- महापूर निबंध मराठी
- महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती निबंध मराठी
- महापुरुषांचे मोठेपण निबंध मराठी
- महात्मा बसवेश्वर निबंध मराठी
- महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी
- महागाई एक समस्या मराठी निबंध
- मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
- मला पडलेले गमतीदार स्वप्न
- मला पंख फुटले तर निबंध मराठी
- मला देव भेटला तर निबंध मराठी
- मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ
- मराठी सिनेमा बदलतोय निबंध मराठी
Leave a Reply Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
हिवाळा ऋतू मराठी निबंध, Essay On Winter Season in Marathi
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हिवाळा ऋतू मराठी निबंध, essay on winter season in Marathi हा लेख. या हिवाळा ऋतू मराठी निबंध माहिती लेखात या विषयाची संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.
सर्व वर्गांतील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकाच लेखात संपूर्ण माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे, जेणेकरून तुमचा सर्व वेळ वाया जाणार नाही. चला तर मग पाहूया हिवाळा ऋतू मराठी निबंध, essay on winter season in Marathi हा लेख.
या लेखातील महत्वाचे मुद्दे
हिवाळा हा भारतातील चार ऋतूंपैकी एक आहे. हिवाळा हंगाम हा सर्वात थंड हंगाम आहे जो नोव्हेंबरच्या मध्यभागी सुरू होतो आणि फेब्रुवारीपर्यंत चालू असतो. हिवाळ्यातील कडाक्याची थंडी साधारणपणे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये अधिक जाणवते. भारतात हिवाळा खूप महत्वाचा आहे.
भारत हा ऋतूंचा देश आहे. भारतात सहा ऋतू आहेत जे एकामागून एक येत असतात. अनेक लोकांचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझा आवडता ऋतू म्हणजे हिवाळा.
भारतात हिवाळा खूप थंड असतो. हिवाळा हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत असतो. भारतात नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी हिवाळा कडाक्याच्या थंडीत बदलतो. हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्री जास्त असतात.
हिवाळ्यापासून वाचण्यासाठी बरेच लोक शेकोटी पेटवून उबदार वातावरण तयार करतात. थंड हंगाम इतर ऋतूंच्या तुलनेत हवामानात अधिक बदल दर्शवितो. वातावरणाचे तापमान झपाट्याने कमी होते, वारे वेगाने वाहू लागतात, दिवस लहान होतात आणि रात्र मोठ्या होत जातात.
कधी कधी दाट ढग, धुके आणि धुक्यामुळे सुर्यही दिसत नाही. थंडीत ओले कपडे सुकायला बराच वेळ लागतो. हिवाळ्याच्या हंगामात धुके खूप सामान्य झाले आहे, धुके तुम्हाला पुढे पाहण्यापासून रोखू शकते आणि रस्त्यावर अनेक अपघात होऊ शकतात. हिवाळा टाळण्यासाठी आम्ही नेहमी उबदार कपडे घालतो आणि प्रत्येकजण रात्री शक्यतो घरातच असतो. थंडीमुळे अनेक पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करतात.
हिवाळ्याच्या ऋतूचे आगमन
भारतात हिवाळा सुरू होण्याची वेळ पृथ्वीच्या अक्षावर सूर्याच्या परिभ्रमणानुसार बदलते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वांनाच माहीत आहे. जेव्हा पृथ्वी उत्तर गोलार्धात फिरते तेव्हा उत्तर गोलार्धात हिवाळा येतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा सर्व ऋतू बदलतात. भारतातील थंड हवामानाचा हिमालय पर्वतांशी जवळचा संबंध आहे. भारतात हिवाळा येतो जेव्हा हिमालयाच्या पर्वतरांगांवर बर्फ पडतो आणि उत्तरेकडून वारे वाहतात.
हिवाळ्यात असलेले निसर्ग दृश्य
थंड हवेच्या ठिकाणी डोंगराळ भाग हिवाळ्यात आणि बर्फाने खूप सुंदर दिसतो, कारण या भागातील प्रत्येक गोष्ट बर्फाने झाकलेली असते. सर्व वस्तूंवर बर्फ मऊ गालिचा सारखा दिसतो.
जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले बहरतात आणि वातावरणाला एक नवीन रूप देतात. उन्हाच्या कमी तापमानामुळे हिवाळ्याचे दिवस खूप छान आणि आल्हाददायक असतात. डिसेंबर आणि जानेवारी हे थंडीचे सर्वात थंड महिने आहेत. लांबच्या सहली आणि सहलीसाठी हा हंगाम सर्वोत्तम आहे. या हंगामात भारतातील बहुतेक पर्यटक आपल्या देशाला भेट देतात.
हिवाळ्याचे महत्त्व
हिवाळा हा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. हिवाळा हंगाम हा भारतातील सर्वात महत्वाचा ऋतू आहे, जो शरद ऋतूतील संक्रांतीपासून सुरू होतो आणि वसंत ऋतूमध्ये संपतो. असह्य थंड हवामानामुळे, बरेच प्राणी गोठलेल्या परदेशी भूमीत स्थलांतर सुद्धा करतात. या हंगामात हिमवर्षाव आणि थंड वादळे सामान्य आहेत.
हिवाळ्यात मॉर्निंग वॉक आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. उन्हाळ्यात आपण जास्त काम करू शकत नाही पण हिवाळ्यात आपण दिवसभर काम करू शकतो. उन्हाळ्यात खूप उष्णता असते ज्यामुळे आपण आजारी पडतो पण हिवाळ्यात आपण आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
हिवाळ्यातील वैशिष्ट्ये
थंड रात्र, लहान दिवस, थंड हवामान, थंड वारा, बर्फवृष्टी, थंड वादळ, थंड पाऊस, दाट धुके, धुके, खूप कमी तापमान इ. सारख्या इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्याच्या हंगामात बरेच बदल होतात. कधी कधी जानेवारी महिन्यात तापमान १ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते.
थंडीच्या मोसमात बहुतेक हिरव्या भाज्या मिळतात. गाजर, वाटाणे, वांगी, कोबी, मुळा यासारख्या हिरव्या भाज्या हिवाळ्यात सहज उपलब्ध होतात. कोबी, बीन्स, मटार, कोबी, बटाटे, मुळा, गाजर, टोमॅटो आणि हिरव्या भाज्या या हंगामात भरपूर उपलब्ध आहेत.
नोव्हेंबर महिन्यापासून थंड वारे वाहू लागतात. जेव्हा थंडी जास्त असते तेव्हा शाळांना हिवाळी सुट्ट्या लागतात.
हिवाळ्यात घ्यायची काळजी
हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत असते, त्यामुळे लोक या काळात आरामात खातात. कमी तापमानामुळे त्वचा कोरडी होण्याची विशेष काळजी घेतली जाते. तेल मसाजसह गरम पाण्याचे स्नान खूप चांगले मानले जाते. थंडीत सकाळी ताज्या हवेत फिरणे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. सकाळी फिरायला गेल्यावर श्वास घेण्यासाठी ताजी, स्वच्छ हवा मिळते.
हिवाळ्यात साजरे केले जाणारे सण
हिवाळ्यात सणांना खूप महत्त्व असते. लोही आणि मकर संक्रांती १४ जानेवारी रोजी उत्तर भारतात साजरी केली जाते. डिसेंबरमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन आणि वसंत पंचमी हे सणही थंडीच्या मोसमात येतात.
हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी होत आहेत. थंडीची सकाळ तुम्हाला एक वेगळीच अनुभूती देते. कॉफी, चहा, हॉट चॉकलेट यासारख्या गरम पेयांचा हिवाळ्यात अधिक आनंद घेतला जातो. सूर्य उशिरा उगवतो आणि कधी कधी वातावरणामुळे दुपार दुपार पर्यंत उगवत सुद्धा नाही.
थोडक्यात, हिवाळा हा इतर ऋतूइतकाच महत्त्वाचा असतो. नक्कीच, त्याच्या नकारात्मक बाजू आणि सकारात्मक बाजू असू शकतात, परंतु हे प्रत्येक हंगामात घडते. हिवाळा तुम्हाला सकाळच्या चालण्याचा आणि ताजी हवेचा आनंद घेण्यास मदत करतो.
आज आपण काय वाचले
तर मित्रांनो वरील लेखात आपण हिवाळा ऋतू मराठी निबंध, essay on winter season in Marathi हि माहिती पाहिली. मला खात्री आहे कि मी हिवाळा ऋतू मराठी निबंध माहिती या विषयावरील सर्व माहिती वरील लेखात मिळाली असेल.
तुम्हाला हा लेख कसा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आमच्या हिवाळा ऋतू मराठी निबंध लेखात काही चूक असेल तर आम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकू किंवा वरील लेखात तुमची अधिक माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.
जाता जाता मित्रांनो, जर तुम्हाला या लेखातून हिवाळा ऋतू मराठी निबंध, essay on winter season in Marathi या विषयावर संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख तुमच्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर नक्कीच शेअर करा.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
माझा आवडता ऋतू – हिवाळा मराठी निबंध | Winter Essay In Marathi |
प्रस्तुत लेख हा माझा आवडता ऋतू – हिवाळा (My Favourite Season Winter Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. हिवाळा ऋतुत काय घडते, त्याचे महत्त्व आणि त्या ऋतूची विशेषता या बाबींची चर्चा या निबंधात केलेली आहे.
माझा आवडता ऋतू – हिवाळा निबंध | My Favourite Season – Winter Essay in Marathi |
भारतात मुख्यतः तीन महत्त्वाचे ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. या तिन्ही ऋतूंचे नैसर्गिक महत्त्व आणि विशेषता वेगवेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या ऋतूंचा आनंद घ्यायला आवडतो. त्यामध्ये मला सर्वात जास्त आवडणारा ऋतू म्हणजे हिवाळा.
हिवाळा हा ऋतू साधारणपणे ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांदरम्यान येतो. पावसाळ्यातील शेतीनंतर हिवाळ्यात सुद्धा पुन्हा शेती केली जाते. हिवाळ्याला शरद ऋतू देखील म्हटले जाते. सूर्याची उष्णता खूप कमी जाणवत असल्याने हा ऋतू अत्यंत आल्हाददायक वाटतो.
हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे कारण या ऋतूत वातावरण पूर्ण थंड झालेले असते. सूर्याच्या तापत्या उष्णतेपासून मुक्ती मिळते. या ऋतूत लोक अधिक ऊर्जावान आणि क्रियाशील बनतात. शरीरात न थकता जास्तीत जास्त काम करण्याचा उत्साह निर्माण होतो.
पहाटेच्या वेळी जी धुक्याची चादर पसरलेली असते ती अनुभवायला खूप आनंद मिळतो. त्यानंतर सकाळी पडलेले सूर्याचे कोवळे ऊन अंगावर घेताना होणारा आनंद तर शब्दातीत आहे. रात्री सुद्धा थंडी पडल्याने शेकोटी करून सर्व शरीर शेकण्यात एक वेगळीच मज्जा येते.
भारतात हिवाळ्याचा हिमालय पर्वताशी संबंध आहे. जेव्हा हिमालयात बर्फ पडतो आणि उत्तरेकडून वारे वाहायला लागतात तेव्हा भारतात हिवाळ्याचे आगमन होते. हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असते.
हिवाळ्यात सकाळच्या वेळी धुके तयार होत असते. अतिशय थंड वातावरण असल्याने सर्दी, खोकला यासारख्या समस्या या ऋतूत मोठ्या प्रमाणात वाढतात. याशिवाय हिवाळ्यात सकाळी चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
हिवाळा ऋतू निरोगी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा हंगाम असतो. आरोग्याच्या बाबतीत हा हंगाम चांगला आहे कारण या हंगामात पाचकशक्ती मजबूत असते. शरीराचे तापमान योग्य प्रमाणात राहण्यासाठी शारिरीक हालचाल आणि अन्नग्रहण यांचे प्रमाण देखील वाढते.
हिवाळा या ऋतूत दिवाळी, नाताळ आणि मकरसंक्रांत असे महत्त्वाचे सण येतात. या ऋतूत सर्व लोक गरम कपडे, हातमोजे, आणि कानटोपी यांचा हमखास वापर करताना आढळतात. असा हा हिवाळा ऋतू आपल्याला जीवनाच्या संघर्षांना सामोरे जाण्यासाठी प्रेरित करतो म्हणून हिवाळा ऋतू मला फार आवडतो.
लेखन सौजन्य – सिद्धी पवार.
तुम्हाला माझा आवडता ऋतू – हिवाळा हा मराठी निबंध (My Favourite Season Winter Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Short Essay on Winter Season
वर्षात सहा ऋतू असतात. हिवाळा हा त्यापैकीच एक. भारतात नोव्हेंबर महिन्यापासून ते फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत जाणवते. त्यात उडिया दिनदर्शिकेनुसार पौष आणि माघ या दोन महिन्यांचा समावेश होतो. साधारणपणे या ऋतूत दिवस लहान आणि रात्र लांब असतात.
हिवाळ्यातील दृश्य खूपच मनोरंजक आहे. सकाळी आकाश धुके असते. थंडीही असते. उत्तरेकडून वारे वाहतात. सकाळी सूर्य खूप उशिरा दिसतो. सूर्यप्रकाश देखील गरम होत नाही. हवामान बऱ्यापैकी आल्हाददायक आहे.
इतर कोणत्याही ऋतूत आपण कोणतेही काम केले तर लवकर थकतो. पण हिवाळ्यात आपण सहजासहजी थकत नाही. या ऋतूत खेडेगावातील जनजीवन अतिशय निस्तेज असते. प्रचंड थंडीमुळे लोकांना सूर्योदयापूर्वी घराबाहेर पडणे आवडत नाही. लोक सहसा सकाळी आणि संध्याकाळी शेकोटी पेटवतात आणि उष्णता मिळवण्यासाठी शेकोटीभोवती गोळा करतात.
शहरी भागात कापड व्यापारी त्यांच्या दुकानात विविध प्रकारचे लोकरीचे कपडे दाखवतात. थंडीपासून आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी लोक ब्लँकेट, स्वेटर, मफलर, हातमोजे आणि मंकी कॅप इत्यादी खरेदी करतात. या ऋतूत श्रीमंत लोक थंडीशी लढू शकत असले तरी गरिबांना मात्र प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्याकडे उबदार कपडे नाहीत. त्यांची घरे हिवाळ्यातील वाऱ्याच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांना श्रीमंतांपेक्षा जास्त त्रास होतो.
त्याशिवाय मटार, वांगी, सोयाबीन, फुलकोबी, कोबी अशा विविध प्रकारच्या भाज्या मिळतात. पेरू, संत्री यासारखी काही फळे या हंगामात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. ओरिसातील लोक याच मोसमात सांबा दशमी उत्सव साजरा करतात.
हिवाळी हंगाम हा वसंत ऋतूसाठी तयारीचा हंगाम आहे. म्हणून, असे म्हटले जाते, “जर हिवाळा आला तर वसंत ऋतु अर्थाच्या फार मागे राहू शकेल का?”
Leave a Reply Cancel reply
You must be logged in to post a comment.
माझा आवडता ऋतू मराठी निबंध My Favourite Season Essay in Marathi
My Favourite Season Essay in Marathi माझा आवडता ऋतू मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या सर्वांचाच कोणता ना कोणता आवडता ऋतू असतो आणि ऋतू हे दरवर्षी बदलत असतात आणि दरवर्षी उन्हाळा , पावसाळा आणि हिवाळा येतो आणि हे तीन ऋतूंचे प्रकार आहेत. आपल्यामधील प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी ऋतू आवडत असती आणि आपण तो ऋतू येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. अनेकांना जरी पावसाळा किंवा थंडी हा ऋतू आवडत असला तरी मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो कारण मला असे वाटते कि उन्हाळ्या सारखा कोणताच ऋतू नाही, कारण उन्हाळा म्हंटले कि आनंदायी वातावरण आणि याच ऋतू मध्ये आपल्याला मजा मस्ती देखील करायला मिळते.
माझा आवडता ऋतू मराठी निबंध – My Favourite Season Essay in Marathi
माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध – essay on summer season in marathi.
उन्हाळा हा असा ऋतू आहे ज्यामध्ये वातावरण हे स्वच्छ असते आणि परंतु थोडे उन्हाळ्यामध्ये गरम जास्त होते परंतु त्याचा आपल्याला त्रास होत नाही. उन्हाळा हा ऋतू स्त्तीचा ऋतू म्हणून देखील ओळखला जातो कारण बहुतेक शाळेमध्ये किंवा कॉलेज मध्ये मार्च महिन्यामध्ये वार्षिक परीक्षा होतात आणि मुलांना एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुट्टी पडते त्यामुळे उन्हाळा हा सुट्टीचा ऋतू म्हणून ओळखला जातो.
आणि उन्हाळ्यामध्ये मुले सर्व वार्षिक अभ्यास संपल्यामुळे निवांत असतात आणि तसेच जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यामध्ये निवांत असतात. तसेच उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्टी असल्यामुळे घरातील महिलांची सुध्दा जास्त धावपळ होता नाही. अश्या प्रकारे सर्व बाजूंनी उन्हाळा हा ऋतू खूप फायदेशीर आहे.
उन्हाळा या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात उष्णता असल्यामुळे ह्या ऋतूमध्ये लोक शक्यतो गार पदार्थ खातात आणि गार पेय पितात जसे कि वेगवेगळ्या फळांचा रस, दही, ताक, नाचण्याची आंबील, लस्सी यासारखे गार पेय पिण्यावर आपण जास्त भर टाकतो कारण उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उष्ण हवामान असते आणि त्यावेळी आपल्याला शरीरामध्ये गार पणा राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गार पदार्थ प्यावे लागतात तसेच आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आईसस्क्रीम , स्मुदी, ब्राऊनी यासारखे अनेक पदार्थ देखील खातो आणि एक कारण आहे.
ज्यामुळे मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो. उन्हाळ्यामध्ये आपण सफरचंद , संत्री , पेरू , मोसंबी , चिक्कू आणि कलिंगड यासारखी फळे खायला खूप छान लागतात आणि कलिंगड तर खायला सुरुवात केले कि खरा उन्हाळा सुरु झाला असे वाटते. तसेच उन्हाळ्यामध्ये आमच्या घरी काकडीची कोशिंबीर , टोमॅटो किंवा दही कांदा बनवतात जेणे करून आपले पोट शांत राहील.
अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ बनवून आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. उन्हाळा ऋतू मला खाण्याचेवेगवेगळे पदार्थ खायला मिळतात म्हणून फक्त आवडत नाही तर उन्हाळा हा ऋतू मला शाळेला सुट्टी असते म्हणून देखील आवडायचा कारण उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी – मार्च महिन्यामध्ये शक्यतो सर्वांच्या वार्षिक परीक्षा आटपून सर्वांना सुट्टी पडलेली असायची.
आणि आम्हाला देखील सुट्टी असायची त्यामुळे आम्ही काही दिवसासाठी तरी शाळेतील वेगवेगळ्या गोष्टींच्यापासून मोकळे झालेलो असायचो कारण वार्षिक परीक्षा झाल्यामुळे अभ्यासाचे कोणतेच टेन्शन असायचे नाही. त्यामुळे निवांत दिवसभर खेळता यायचे तसेच मित्रांच्या सोबत मज्जा – मस्ती करायला मिळायची.
खेडे गावामध्ये पहिले तर उन्हाळ्यामध्ये मुलांचे नदीला किंवा विहिरीला पोहायला जाणे हे ठरलेले असते आणि खेडे गावातील मुले हि सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा अंघोळ करण्यासाठी जातात तसेच शहरातील मुले देखील स्विमिंग टँक मध्ये जाऊन पोहण्याची मजा घेतात. अश्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण अनादी राहू शकतो.
उन्हाळ्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे फिरायला जाने, असे अनेक लोक आहेत जे उन्हाळा सुट्टी मध्ये फिरायला कोठे ना कोठे तरी फिरायला जातात. फिरायला जाणे हा उन्हाळयामधील आमचा आवडता उपक्रम आहे कारण कोणत्याही ठिकाणी गेले कि तेथील माहिती मिळते आणि आपल्याला वेगळ्या ठिकाणी गेल्याचा फील येतो आणि कोठे तरी प्रेक्षणीय स्थळी फिरायला शक्यतो लोक उन्हाळ्यामध्ये जातात
कारण उन्हाळ्यामध्ये वातावरण खूप स्वच्छ असते आणि तसेच उन्हाळ्यामध्ये लोक निवांत असतात तसेच मुलांना देखील सुट्ट्या असतात त्यामुळे घरातील सगळी मंडळी मिळून फिरायला जाण्यासाठी हा एक उत्तम ऋतू आहे. उन्हाळ्यामध्ये लोक अश्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात जसे कि समुद्र किनारा, वॉटर पार्क, नैसर्गिक ठिकाणे, धबधबे अश्या गार वाटणाऱ्या ठिकाणी फिरायला जातात.
उन्हाळा हा ऋतू बघायला गेला तर सगळ्या दृष्टीने तसा चांगला आहे. ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये स्त्रियांची खूप धावपळ चालू असते कारण ग्रामीण भागातील नाहुतेक स्त्रिया उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे, पापड, लोणचे बनवून ठेवतात जेणेकरून ते थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये खाता यावे.
उन्हाळ्यामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो तसेच शाळेपासून २ महिने सुट्टी असल्यामुळे आपण आपले वेगेगले छंद जोपासू शकतो. उन्हाळा हा जास्त उष्ण असल्यामुळे गरम होते आणि म्हणून लोक उन्हाळ्यामध्ये शक्यतो सुती कपडे, पातळ कपडेच परिधान करतात तसेच उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी खूप गर्दी असते. म
ला उन्हाळा आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे उन्हाळा या ऋतूमध्ये आंबे लागायला सुरुवात होते आणि मला हापूस आंबा खूप आवडतो आणि हा हापूस आंबा मार्च नंतर बाजारामध्ये यायला सुरुवात होते आणि हापूस आंबा खूप आवडत असल्यामुळे आम्ही घरातील सर्व व्यक्ती आंब्याच्या सिजनमध्ये हापूस आंबे मनसोक्त खातो.
तसेच उन्हाळ्यामध्ये कच्चे आंबे लागतात आणि त्यापासून बनवलेला आंब्याचा करम, पन्हे आणि इतर पदार्थ देखील खूप आवडतात. त्याचबरोबर उन्हाळा ऋतूमध्ये कोकण भाग हा देखील खूप चांगल्या प्रकारे बहरलेला असतो आणि कोकणामध्ये सगळीकडे हिरवीगार झाडी असते तसेच करवंद, काजू यासारखी फळे देखील उन्हाळ्यामध्ये खायला मिळतात म्हणजेच या प्रकारचा कोकण मेवा आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायला मिळतो.
तसेच कोकण भाग हा गार झाडांच्या गर्दीने भरलेला असतो आणि कोकणामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्यामुळे कोकण भागामध्ये पर्यटकांची देखील खूप गर्दी पाहायला मिळते. अश्या प्रकारे एकूणचा उन्हाळा हा महिना सगळ्याच गोस्तीन्च्यासाठी फायदेशीर असतो तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो आणि उन्हाळा हा असा ऋतू आहे जो आपल्याला मनोरंजक वाटतो.
आम्ही दिलेल्या my favourite season essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता ऋतू मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite season in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि summer essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट
Share this:
Leave a comment उत्तर रद्द करा..
पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.
Notify me of follow-up comments by email.
Notify me of new posts by email.
दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi :- दिवाळी हा संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. विशेष बाब म्हणजे हा सण जवळपास प्रत्येकाचाच आवडीचा सण आहे. सर्वांनाच दिवाळी हा सण खूप आवडतो. त्यामुळेच आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध essay on diwali … Read more
गुढीपाडवा वर निबंध मराठी | gudi padwa essay in marathi
गुढीपाडवा मराठी निबंध gudi padwa essay in marathi :- भारत देश हा वैविध्यपूर्ण संस्कृतीने बहरलेला आहे. या देशात तिथीनुसार अनेक सांस्कृतिक आणि पारंपरिक सण उत्सव साजरे केले जातात. गुढीपाडवा सण हा देखील भारत देशातील संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. गुढीपाडवा हा सण भारत देशातील बऱ्याच राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! … Read more
[शिमगा] होळी सण मराठी निबंध | essay on holi in marathi
होळी सण मराठी निबंध (essay on holi in marathi) :- भारत देश हा अनेक धार्मिक लोकांचा निवासस्थान आहे. या देशात विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, आनंदाने सण उत्सव साजरे करतात. यातच होळी हा सण देखील संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या सणाचे विविध धर्मात खूप महत्व आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये … Read more
प्रदुषण एक समस्या मराठी निबंध | प्रदुषण वर मराठी निबंध | essay on pollution in marathi
प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi :- प्रदुषण ही आज मनुष्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येमुळे माणूस खूप अडचणीत आला आहे. माणसाने तंत्रज्ञानाचा विकास करून आपले दैनंदिन जीवन सुखी तर केले पण यामुळे त्याचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. आज प्रदुषण ही एक समस्या बनली आहे. त्यामुळे या विषयावर … Read more
मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh
मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh :- दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग, अनुभव, घटना घडत असतात ज्या की दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्यात काही चांगल्या गोष्टी, चांगले अनुभव असतात तर काही भयानक प्रसंग देखील असतात. अशा घटना नेहमी दीर्घकाळ लक्षात राहतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला मी पाहिलेला … Read more
ध्वनि प्रदूषण वर निबंध | Sound pollution essay in marathi
Sound pollution essay in marathi ध्वनी प्रदुषण वर निबंध : आजच्या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, दररोज काही न काही नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सहज आणि सोपे जरी केले असले तरी पण काही समस्या देखील निर्माण केल्या आहेत. यातील ध्वनी प्रदुषण ही सध्या सर्वात गंभीर समस्या आहे. आजच्या या … Read more
जल हेच जीवन आहे मराठी निबंध jal hech jivan ahe marathi nibandh
जल हेच जीवन आहे मराठी निबंध jal hech jivan ahe marathi nibandh : पाणी हा घटक सजीव सृष्टी साठी किती महत्वाचा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक जण पाण्याचे महत्व जाणतो. पाणी हे संपूर्ण सजीव जगतासाठी अमृत आहे. पाण्याविना जगणे अशक्य आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला “जल हेच जीवन आहे” … Read more
सूर्य उगवला नाही तर…मराठी निबंध surya ugavla nahi tar marathi nibandh (७००+ शब्दात)
सूर्य उगवला नाही तर…मराठी निबंध surya ugavla nahi tar marathi nibandh :- सूर्य हा निसर्गाने आपल्याला दिलेला एक अनमोल रत्न आहे. त्याच्या असण्यानेच आज पृथ्वीवर सजीव सृष्टी जगणे संभव आहे. पण जर सूर्य उगवला नाही तर…सूर्य नसता तर….असा विचार करणे देखील खूप भयानक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला सूर्य उगवला … Read more
माझी आजी मराठी निबंध | Maji aaji marathi nibandh
Maji aaji marathi nibandh, my grandmother essay in marathi माझी आजी मराठी निबंध : आजी ही सर्वांनाच हवीहवीशी वाटते. घरामध्ये आजी असेल तर घराला शोभा येते, घरात प्रेमाचे वातावरण तयार होते. आजी सर्वांशी प्रेमाने वागते आणि सर्वांनाच त्यांच्या कामात काही न काही मदत करत असते त्यामुळे सर्वांनाच आजीचा हेवा वाटतो. आजच्या या पोस्टमध्ये majhi aaji … Read more
माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi
माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi :- भारत देश हा अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. तसेच भारताला “ऋतूंचा देश” असे देखील संबोधले जाते. कारण भारत देशामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ही तिन्ही ऋतू आढळतात. इतर अनेक देशामध्ये केवळ एक किंवा दोन ऋतू असतात. पण या तीनही ऋतूमध्ये पावसाळा … Read more
- जीवन चरित्र
- ज्ञानवर्धक माहिती
- पक्षी माहिती
- प्राणी माहिती
माझा आवडता ऋतू [उन्हाळा]। My Favourite season summer essay in Marathi
माझा आवडता ऋतू | उन्हाळा निबंध मराठी| maza avadta rutu nibandh.
1] माझा आवडता ऋतू (Summer essay in Marathi) (200 words)
भारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही लोकांना हा ऋतु खूप आवडतो. उन्हाळा 4 महिन्यासाठी असतो (मार्च, एप्रिल, मे आणि जून) पण या महिन्यापैकी मे आणि जून हे सर्वात जास्त गरम महिने असतात. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात.
उन्हाळ्याची सुरवात होळी च्या उत्सवानंतर व्हायला लागते. या ऋतूत उन्हामुळे जमिनीवरील पाण्याचे बाषपीभवन होऊन त्याचे आकाशात ढग बनायला लागतात व पावसाळ्यात याच ढगांमुळे पाऊस येतो. या ऋतूत शाळा कॉलजाना सुट्ट्या असतात. त्या मुळेच मुलांना मनोरंजन व आराम मिळतो.
पण एकीकडे हा ऋतु लहान मुलांना आनंद देतो तर दुसरी कडे याचे नुकसान पण सहन करावे लागतात. उन्हाळा लोकांना खूप साऱ्या संकटात देखील टाकतो. अतिउच्च उष्णते मुळे उन्हाळ्याच्या दुपारी शरीरात पाण्याच्या कमतरतेने लोकांना लू लागल्याने आजार वाढतात. यामुळे बरेच लोक मृत्युमुखी सुद्धा पडतात.
उन्हाळ्यात भारतातील बऱ्याच ठिकाणी लोक पाण्याच्या कमतरते मुळे दुष्काळाला सामोरे जातात. कारण या दरम्यान सर्व नद्या, नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडतात. या सोबतच झाडांचे पाने सुद्धा पाण्याचे कमतरतेने गळून पडतात. चारही बाजूंना धूळ युक्त गरम हवा वाहत असते, हि हवा लोकांच्या आरोग्याला हानिकारक असते. म्हणून अश्या काळात अधिकाधिक फळ खायला हवीत. थंड पेय प्यायला हवीत व उन्हापासून स्वतःचा बचाव करायला हवा.
2] माझा आवडता ऋतू उन्हाळा. (Summer marathi essay 2) (300 words)
उन्हाळा हा वर्षातील 4 ऋतु पैकी एक आहे. वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असताना देखील मुलांना हा ऋतु खूप आवडतो. कारण या ऋतूत खूप साऱ्या पद्धतींनी मुलांना आनंद मिळतो. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात.
उन्हाळ्याला उष्णतेचा ऋतु म्हटले जाते. यालाच ग्रीष्म ऋतु देखील म्हटले जाते. ग्रीष्म ऋतू ची सुरुवात वसंत ऋतु नंतर होते. आपण सर्व जाणून आहोत की पृथ्वी गोलाकार आहे आणि ती स्वतः भोवती फिरत असताना सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक गोलार्ध सुर्याचा जवळ पोहोचतो त्यावेळी पृथ्वीच्या त्या भागावर उष्णता निर्माण होतो. व या कालावधीला उन्हाळा म्हटले जाते. भारतात उन्हाळ्याचा काळ हा एप्रिल महिन्यांपासून सुरू होतो.
हिवाळ्यात हवेहवेसे वाटणारे कोवळे ऊन देखील उन्हाळ्यात नकोसे होऊन जाते. कारण या काळात सुर्याचा प्रकाश खूप प्रखर असतो. परंतु मुलांना हा काळ खूप आवडतो. उन्हाळ्याच्या या काळात शाळा कॉलेजला दीर्घ सुट्टी मिळाली असते. लहान मुलांना शाळेत जाण्याचे टेन्शन राहत नाही.
शहरी भागातील लोक जास्त प्रमाणात उष्णता सहन करू शकत नसल्याने ते सुट्टीच्या काळात आपल्या कुटुंबासह सुट्या साजऱ्या करण्यासाठी थंड स्थानांना भेट देतात. समुद्र, पहाडी क्षेत्र अश्या ठिकाणी पिकनिक स्पॉट बनवले जातात. लोकांना उन्हाळ्यात पोहणे, उन्हाळ्याचे फळ खाणे व शीतल पेय पिणे आवडते.
काही लोकांना उन्हाळा चांगला वाटतो कारण ते थंड प्रदेशात जाऊन आनंद घेतात व स्वतःचे मनोरंजन करवून घेतात. पण ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना साठी उन्हाळा सहन करण्याजोगा नसतो. उष्णतेमुळे नैसर्गिक स्रोतांचे कमी व्ह्यायाला लागते. नद्या, तलाव व विहिरी सुखल्या मुळे लोकांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यासाठी हा काळ पेरणी चा असतो त्यामुळे त्याला अधिक मेहनत घ्यावी लागते.
मुलांसाठी हा ऋतु खूप मस्त आहे कारण याच महिन्यामध्ये त्यांना उन्हाळी सुट्ट्या मिळतात. मुले परिवारासोबत मौज करतात. फिरायला जातात आणि उन्हाळ्याच्या फळांसोबत शीतल पेय व आईस क्रीम देखील खातात. सुर्य उगवण्याआधी लोक सैर सपाटा मारायला जातात. आणि इत्यादि अनेक करणे आहेत ज्यामुळे मला देखील उन्हाळा खूप आवडतो.
3] माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध (My Favourite season summer essay in Marathi) (400 words)
उन्हाळा हा वर्षातील तीन ऋतु पैकी एक आहे. जरी हा ऋतू वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असला तरी लहान मुलांना हा ऋतु इतर ऋतूंच्या तुलनेत सर्वात जास्त आवडतो. कारण या ऋतूत शाळा कॉलेजांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात. उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांच्या वेगवेगळ्या पद्धतींनी आनंद उपभोगला जातो. उन्हाळा ऋतुत पृथ्वी सर्वात जास्त प्रमाणात सूर्याकडे झुकलेली असते. उन्हाळा सर्वात उष्ण आणि कोरडा ऋतू आहे. या ऋतूत दुपारी व संध्याकाळी उष्ण वारे वाहतात.
संपूर्ण वर्षभरातून उन्हाळ्याचा कालावधी माझा आवडता काळ असतो. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आमच्या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या 60 दिवसांच्या असतात. या सुट्ट्या एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून सुरू होऊन जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राहतात. या सुट्यांचा उद्देश शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आराम, मनोरंजन व इतर नवीन गोष्टी शिकण्याचा आहे.
मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझे मामा, मावशी व आजीच्या घरी जातो. वेगवेगळ्या गावी जाऊन मी आनंद साजरा करतो. जवळपास 15-20 दिवस मी गावोगावी फिरतो. यानंतर आपल्या घरी परत आल्यावर दररोज खेळणे व मजा करणे सुरू होते. मला बॅडमिंटन , क्रिकेट , फुटबॉल इत्यादी खेळ खेळायला खूप आवडते. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यामध्ये मी माझ्या मित्रांसोबत दररोज संध्याकाळी हे खेळ खेळतो. उन्हाळ्यात फक्त सकाळी वातावरण थंड असते म्हणून आम्ही सकाळीच उठून मॉर्निंग वॉक करतो.
दुपारी बाहेर उन्हाचा कडाका असल्याने बाहेर निघायची इच्छाच होत नाही. मग अश्यावेळी मी मस्त पैकी कूलर लाऊन टीव्ही वर माझे आवडते कार्टून पाहतो. थंडगार हवेत टीव्ही पाहण्याची मजाच वेगळी असते. या शिवाय उन्हाळ्यात खूप साऱ्या आनंददायी गोष्टी मी करतो. सकाळ संध्याकाळ आनंददायी नाश्ता, दुपारी आईने कापलेले थंडगार टरबूज, थंडगार लिंबू शरबत, संध्याकाळी वडिलांसोबत लस्सी आणि आईस क्रीम या सर्व गोष्टी मला खूप उत्साही करतात. सुट्ट्यांमध्ये दरवर्षी आमच्या घरात आंब्याचा रस केला जातो. आंबा माझे आवडते फळ आहे. मला आंबा व आंब्याचा रस प्यायला खूप आवडते.
मागील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मी स्केटिंग शिकण्याचा विचार केला होता. स्केटिंग एक मनोरंजक खेळ आहे. माझ्या वडिलांनी मला स्केटिंग क्लास लावून दिला होता. लवकरच मी या खेळात तरबेज झालो. उन्हाळ्याच्या या सुट्टीत वेळेचा सदुपयोग म्हणून मी दरवर्षी काही न काही नवीन शिकत असतो.
उन्हाळ्याचा कालावधी आपल्या दररोज च्या कंटाळवाण्या जीवनापासून एक लांब ब्रेक देतो. या सुट्ट्या आपल्याला खूप काही शिकण्यासाठी प्रेरणा देखील देतात. आम्ही बऱ्याचदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी भेट देतो. समुद्र, पहाडी भाग आणि इतर थंड ठिकाणी आम्ही कॅम्प करून दिवस घालवले आहेत. पुढील वर्षासाठी माझ्या वडिलांनी सिंगापूर जाण्याची योजना देखील बनवली आहे.
उन्हाळ्याचा सुट्ट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांना आराम मिळवा म्हणून तर आहेच पण या काळात आपल्याला खूप काही शिकता देखील येऊ शकते. जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत ते या सुट्ट्यांचा सदुपयोग करून नवीन गोष्टी शिकू शकतात. या वेळेत सामान्य ज्ञान वाढवणे नवीन नवीन पुस्तके आणि कादंबरी वाचणे फार उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्याचा सुट्ट्या आपल्या सर्वांगीण विकासासाठी फार उपयोगी आहेत. म्हणूनच माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे.
तर मित्रांनो हे होते माझा आवडता ऋतू उन्हाळा (maza avadta rutu nibandh) या विषयावर लिहिलेला मराठी निबंध. आमच्या या website वर तुम्हाला मराठी भाषणे व मराठी निबंध मिळतील, म्हणून जेव्हा कधी तुम्हाला निबंध किंवा भाषण तयार करायचे असेल तेव्हा भेट द्या https://www.bhashanmarathi.com/ ला
माझा आवडता ऋतू उन्हाळा विडिओ पहा-
- अधिक वाचा-
- पावसाळा मराठी निबंध।
- हिवाळा मराठी निबंध।
टिप्पणी पोस्ट करा
- Birthday Wishes in Marathi
Contact form
पाणी म्हणजे जीवन निबंध | Water is Life Essay in Marathi
या पोस्टमध्ये आम्ही पाणी म्हणजे जीवन या विषयावर Water is Life Essay in Marathi निबंध लिहिला आहे. यामध्ये आम्ही परिचय, पाण्याचे महत्त्व, पाणी बचतीचे उपाय याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. हा निबंध शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चांगल्या शब्दात लिहिला आहे. कृपया पोस्ट पूर्ण वाचा.
Table of Contents
पाणी म्हणजे जीवन निबंध मराठीत | Water is Life Essay in Marathi
पाणी हा निसर्गाने आपल्याला दिलेला एक महत्त्वाचा स्त्रोत आहे परंतु इतर संसाधनांप्रमाणे ते देखील मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. तसे पाहता, आपल्या पृथ्वीवर 70 टक्के पाणी आहे, परंतु जे पाणी मानव पिऊ शकतो त्यापैकी फक्त 1 टक्के पाणी, उर्वरित पाणी नद्या, तलाव आणि पर्वतांमध्ये बर्फाच्या रूपात साठवले जाते.
पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही कारण पाण्याअभावी माणसाचा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे पाणी हे जीवन आहे आणि ते मर्यादित प्रमाणातच अस्तित्वात आहे आणि जर आपण त्याचा दुरुपयोग करत राहिलो तर एक वेळ अशी येईल की आपल्याला प्यायलाही पाणी नसेल.
पाण्याचे महत्त्व
आजपर्यंत ज्ञात असलेल्या संपूर्ण सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे, जिथे पाण्याचा विपुल साठा आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. पाण्यामुळे पृथ्वीवर जिवंत जग शक्य झाले आहे. जिवाणूंपासून ते अगदी स्थूल प्राण्यांपर्यंत आणि हत्तींपर्यंत आणि शेवाळापासून ते आकाशी झाडांपर्यंत, प्रत्येकाचे जीवन पाण्यावर आधारित आहे. मानवी शरीरात पाण्याचे कमाल प्रमाणही तेवढेच असते.
पाण्याअभावी जीवन जगणे कठीण होऊन ते शरीरात कृत्रिम मार्गाने भरून काढावे लागते. आपले अन्न, वस्त्र, इमारती, स्वच्छता , आरोग्य आणि पर्यावरण संतुलनासाठी पाण्याला पर्याय नाही. आपला आराम, आनंद आणि मनोरंजन देखील पाण्याशी जोडलेले आहे. घरांमध्ये, उष्णता टाळण्यासाठी कपडे धुणे, अन्न शिजवणे, आंघोळ करणे आणि कुलर चालवणे यासाठी पाणी उपयुक्त आहे.
आम्ही जलकुंभात पोहण्याचा आणि नौकाविहाराचा आनंद घेतो. आपल्या घरांमध्ये आणि बागांमध्ये पाण्याची गरज आहे. उद्याने आणि जंगलांची हिरवळ केवळ पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याशिवाय शेतीची कल्पनाही करता येत नाही. जीवसृष्टीचे अस्तित्व आणि पोषण यांच्याशी निगडीत कोणतीही गोष्ट बघा, त्यात पाण्याचे योगदान निश्चितच आवश्यक असते.
पाण्याचा गैरवापर आणि त्याचे परिणाम
माणूस सतत आपल्या कृतीने पाणी दूषित करत असतो त्यामुळे पाणी प्रदूषित होते आणि दूषित पाण्याच्या वापरामुळे कॉलरा, कॉलरासारखे आजार उद्भवतात. पाणी असेच वाहत राहिल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे जमीन नापीक होत असून झाडे-झाडे यांचे योग्य संगोपन होत नाही. पाण्याच्या अनावश्यक वापरामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात आहे. पाण्याचा असाच दुरुपयोग होत राहिल्यास त्याचे परिणाम फार भयंकर होतील.
पाणी संवर्धन
पाणी हे जीवन आहे, त्यामुळे त्याचे संवर्धन आणि संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. घराच्या छतावर टाकी बनवून पावसाच्या पाण्याची बचत करता येते, ज्याचा वापर कपडे धुण्यासाठी आणि साफसफाईसाठी करता येतो. नळ चालू न ठेवता आणि तुटलेल्या पाण्याचे पाईप दुरुस्त करूनही आपण पाणी वाचवू शकतो.
पृथ्वीच्या आतील पाण्याची कमी होत चाललेली पातळी ही आगामी जलसंकटाचा इशारा आहे. पृथ्वीचे वातावरण तापत आहे आणि त्यामुळे नद्यांचे जन्मस्थान असलेल्या हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत.
असे होऊ नये की आपल्या प्रसिद्ध नद्यांची केवळ नावेच उरतील, त्यामुळे तन, मन, धनाने जलसंधारण यशस्वी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख खूप आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल Water is Life Essay in Marathi आणि त्यासोबत तुम्हाला इतर मनोरंजक माहिती देखील आवडली असेल.
हे पण वाचा-
- माझा आवडता छंद मराठी निबंध
- मराठीत गुलाबावर निबंध
- निबंध वेळ पैसा आहे
- मराठीत गाय वर निबंध
नमस्कार मित्रांनो माझे नाव “Rajesh Pahan” आहे मी learningmarathi.in वेबसाइटचा संस्थापक आहे. मी गेली ३ वर्षे ब्लॉगिंग करत आहे, ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की मी मराठीत सर्व लोकांना योग्य माहिती देऊ शकेन.
Leave a comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Essays service custom writing company - The key to success
Quality is the most important aspect in our work! 96% Return clients; 4,8 out of 5 average quality score; strong quality assurance - double order checking and plagiarism checking.
Leave a Reply Cancel reply
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Constant customer Assistance
All our papers are written from scratch. To ensure high quality of writing, the pages number is limited for short deadlines. If you want to order more pages, please choose longer Deadline (Urgency).
Bennie Hawra
"The impact of cultural..."
Please fill the form correctly
Finished Papers
- History Category
- Psychology Category
- Informative Category
- Analysis Category
- Business Category
- Economics Category
- Health Category
- Literature Category
- Review Category
- Sociology Category
- Technology Category
Parents Are Welcome
No one cares about your academic progress more than your parents. That is exactly why thousands of them come to our essay writers service for an additional study aid for their children. By working with our essay writers, you can get a high-quality essay sample and use it as a template to help them succeed. Help your kids succeed and order a paper now!
Write an essay from varied domains with us!
Customer Reviews
IMAGES
VIDEO
COMMENTS
हिवाळा ऋतु वर मराठी निबंध ५०० शब्द (Winter season essay in Marathi 500 words) भारत हा हंगामांचा देश आहे. भारतात सहा हंगाम आहेत जे सतत चालू असतात. सर्व लोकांचा ...
Short essay on winter season in Marathi language. Marathi Nibandh ह्या ठिकाणी आपल्यांना मिळतील योग्य मराठी निबंध, मराठी भाषे मधे.
Set 1: माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध - Winter Essay In Marathi; Set 2: थंडीतील सकाळ मराठी निबंध - Maza Avadta Rutu Hivala Marathi Nibandh
Essay on winter season in Marathi: हिवाळा ऋतू मराठी निबंध, hivala rutu nibandh Marathi या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे.
मुख्यपृष्ठ निबंध Marathi essay माझा आवडता ऋतू हिवाळा। हिवाळा निबंध मराठी। Winter essay information in Marathi.
Winter Season Information in Marathi हिवाळ्याचे वर्णन हिवाळा हा तसा बहुतेक सगळ्यांचा आवडीचा ऋतू. ह्याला खूप वेगवेगळी विशेषण पण दिली आहेत. गुलाबी थंडी,
प्रस्तुत लेख हा माझा आवडता ऋतू - हिवाळा (My Favourite Season Winter Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. हिवाळा ऋतुत काय घडते, त्याचे महत्त्व आणि त्या ऋतूची विशेषता या ...
My Favorite Season Essay In Marathi माझा आवडता ऋतू या विषयावर आज मी निबंध लिहित आहोत. सर्वात आवडता ऋतू म्हणजे हिवाळा. लोकांना हिवाळा आवडतो कारण त्यांना थंडपणा
Marathi . हिन्दी বাংলা ગુજરાતી ಕನ್ನಡ മലയാളം मराठी தமிழ் తెలుగు اردو ਪੰਜਾਬੀ . Winter Season Essay
Marathi . हिन्दी বাংলা ગુજરાતી ಕನ್ನಡ മലയാളം मराठी தமிழ் తెలుగు اردو ਪੰਜਾਬੀ . Short Essay on Winter Season वर्षात सहा ऋतू असतात. हिवाळा हा त्यापैकीच एक.
My Favourite Season Essay in Marathi माझा आवडता ऋतू मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या सर्वांचाच कोणता ...
Winter Season Essay in Marathi . हिवाळा ऋतू मराठी निबंध, Essay on Winter Season in Marathi. January 12, 2024 by Marathi Social.
मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...
100+ मराठी निबंध Marathi Nibandh, Essay In Marathi. निबंध हा सहसा लेखकाचा दृष्टीकोन किंवा कथांच्या रूपरेषा लिहिण्याचा एक छोटासा भाग असतो.
Collection of marathi essays. माझा आवडता छंद मराठी निबंध my favourite hobby essay in marathi :- छंद हा मानवाच्या जीवनातील खरा दागिना आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
ग्लोबल वार्मिंग वर मराठी निबंध Global Warming Essay In Marathi { ४०० शब्दांत } ग्लोबल वार्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ होण्याचा परिणाम ...
Rainy Season Essay In Marathi उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन सुंदर ऋतूंचा भारताला आशीर्वाद आहे. तिन्हीपैकी, पावसाळी पर्जन्यमान हा भारतातील सर्वात सुंदर
1] माझा आवडता ऋतू (Summer essay in Marathi) (200 words) भारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही ...
वसंत ऋतु वर मराठी निबंध (Spring season essay in Marathi) वसंत ऋतू हा आपल्या सर्वांसाठी आनंददायक आहे. भारतात वसंत ऋतू हा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात ...
या पोस्टमध्ये आम्ही पाणी म्हणजे जीवन या विषयावर Water is Life Essay in Marathi निबंध लिहिला आहे. यामध्ये आम्ही परिचय, पाण्याचे महत्त्व, पाणी बचतीचे उपाय याविषयी संपूर्ण ...
Short Essay On Winter Season In Marathi Language - 100% Success rate Level: College, University, High School, Master's, PHD, Undergraduate. Hire a Writer. Robert. Literature ... Esl Rhetorical Analysis Essay Editing For Hire Uk, Essay Truancy Among Students, Dissertation Les Femmes Savantes, Free Urdu Essay Books, Resume Objective For Second ...
Winter Essay In Marathi, Bachelor Thesis Problemstellung, Delhi Essay In Punjabi, Cheap Rhetorical Analysis Essay Ghostwriter Website Us, Automatic Paper Grading, Ielts Academic Writing Task 1 Sample Answers, Business Cover Letter For Chinese Visa 100% Success rate
By working with our essay writers, you can get a high-quality essay sample and use it as a template to help them succeed. Help your kids succeed and order a paper now! Niamh Chamberlain. #26 in Global Rating. Kaylin G. 2191 Orders prepared. Download, submit, move on.